शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

ट्रक असो की बस की कार... दरीत कोसळण्यापूर्वीच थांबणार; गडकरींनी केली नव्या तंत्रज्ञानाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:53 IST

आता बांबू क्रॅश बॅरियर्स देखील बनविण्यात आले आहेत. आसाममधून येणारे बांबूंचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत हायवेवरील ट्रक, बस आणि कारच्या अपघातांवर एका नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. राज्यसभेतील स्वीकृत सदस्य गुलाम अली यांनी एक प्रश्न विचारला होता. यावर गडकरींनी हे उत्तर दिले आहे. तसेच दुर्गम भागांत सरकार या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. 

काश्मीरमध्ये हायवेंवर ट्रक अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. रस्त्यांवर क्रॅश बॅरिअर असतात परंतू ट्रकचे वजन एवढे असते की जर तो ट्रक घसरून खाली कोसळतो, आजुबाजुला हायड्रो प्रोजेक्ट असल्याने तो ट्रक तर सापडत नाही पण मृतदेहही सापडत नाहीत. यामुळे डोड्डा ते किश्तवाड आणि उधमपूर ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाती क्रॅश बॅरिअर्स बसवल्यास अपघात थोडे कमी होऊ शकतात, अशी मागणी अली यांनी केली. 

यावर गडकरी यांनी उत्तर दिले. पूर्वी क्रॅश बॅरिअर्स लोखंडाचे असायचे. आता नवीन तंत्रज्ञान आले आहे. या तंत्रात, एक गोल प्लास्टिकचे उपकरण कॉंक्रिटमध्ये एम्बेड केले जाते. यामध्ये ट्रकने कितीही जोरात धडक दिली तरी तो खाली पडत नाही, तर मागे येतो. या उपकरणाची किंमत थोडी जास्त आहे. उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, अरुणाचल प्रदेश यांसारख्या अवघड डोंगराळ भागात असे अपघात होतात. असे अपघात कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करू. या तंत्रज्ञानाचा प्रयोग आम्ही काही ठिकाणी केला आहे, असे गडकरी म्हणाले. 

आता बांबू क्रॅश बॅरियर्स देखील बनविण्यात आले आहेत. आसाममधून येणारे बांबूंचे इको-फ्रेंडली क्रॅश बॅरिअर्स बनवत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आदिवासी आणि शेतकऱ्यांना रोजगार मिळत आहे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघात