शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांचा बळी घेणारा मामा-भाच्याचा डोह ठरताहे पर्यटकांचा कर्दनकाळ

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.

हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्‍यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोहात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने या डोहाच्या भोवताल तारांचे कुंपण घालण्याची व तेथे सुरक्षेसाठी पोलिसांची किमान शनिवार-रविवार व शासकीय सुट्यांच्या दिवशी ड्युटी लावणे गरजेचे बनले आहे.
अकोला, बुलडाणा व अमरावती सीमेवर वसलेल्या वारी भैरवगड येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर असून, त्याची स्थापना शेकडो वर्षांपूर्वीची असून, याच मंदिराच्या पायथ्याशी मामा-भाच्याचा डोह आहे. जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी येत असतात. विद्यार्थी आंघोळीसाठी या पाण्यामध्ये उतरतात व पोहणे नसल्याने त्यातच त्यांचा मृत्यू होतो. मागील १० ते १५ वर्षांपासून या मामा-भाच्याच्या डोहामध्ये अनेकांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यामध्ये युवक व शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. या डोहामध्ये पाण्याची पातळी कळत नसल्यामुळे त्या ठिकाणी आंघोळीला गेले असता काही समजण्याआधीच त्यामध्ये बुडतात.
शनिवार, रविवार तसेच होळी पौर्णिमा या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात वारी भैरवगड येथे हनुमान दर्शन तथा वान धरण पाहण्यासाठी येतात व या डोहाच्या खोलीची व कपारींची पुसटशीही कल्पना नसताना ते पोहण्यास त्यात उतरतात. यापूर्वी येथे मृत्यू झालेल्यांच्या नावाची यादी या ठिकाणी लावण्यात आली होती; परंतु तो फलकसुद्धा आता या ठिकाणी नाही. या डोहामुळे होणारे पर्यटकांचे मृत्यू टाळण्यासाठी डोहाच्या चहूबाजूला तारेचे कम्पाउंड करणे गरजेचे असून, पर्यटकांना या डोहाच्या धोक्याबाबत जागरुक करण्यासाठी तेथे फलक लावणेही आवश्यक आहे. या बाबीचा विचार करून सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या ठिकाणी कम्पाउंड करून पर्यटकांचे जीव वाचविण्यासाठी फलक लावल्यास ते समाज हिताचे ठरू शकेल. (प्रतिनिधी)
फोटो : ०६एकेटीपी०३ व ०४.जेपीजी
कॅप्शन : वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह आणि काठावरील आसरा मंदिर.
........................