शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 09:17 IST

Maharashtra News: केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले. तथापि, यापैकी केंद्राने ४९.३२ कोटी रुपये दिले; यापैकी राज्य सरकार  ३६.४९ कोटी रुपयेच या प्रकल्पांवर खर्च करू शकले; म्हणजे एकूण मंजूर निधीपैकी फक्त ३३ टक्के निधीच खर्च करण्यात आला.केंद्र सरकारने २०१५-१६ या पाच वर्षांत सिंधुदुर्ग किनारपट्टी क्षेत्र (शिरोडा चौपाटी, सागरेश्वर तारकर्ली, विजयदुर्ग (चौपटी आणि खाडी), देवगड (किल्ला आणि चौपाटी)  मिठाबाव, तोंडवली, मोचेमाड आणि निवती किल्ल्याच्या विकासासाठी १९ कोटी रुपये मंजूर केले होते; परंतु, यापैकी १४.८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. वाकी - आदासा धापेवाडा पारडिंसगा छोटा जात बाग तेलखंडी गिराड या अध्यात्मिक क्षेत्र प्रकल्पासाठी २०१८-१९ दरम्यान ५४ कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी २४ कोटी रुपये देण्यात आले. परंतु, राज्य सरकार फक्त १३ कोटी रुपये खर्च करू शकले. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचे कामही गोगलगायीच्या गतीने होत आहे. २०१७-१८ मध्ये यासाठी  केंद्राने मंजूर केलेल्या ३७.८१ कोटी रुपयांच्या निधीपैकी राज्य सरकारने फक्त ८.४९ कोटी रुपयेच खर्च केले. लोकसभेत सुनील मेंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकास प्रकल्पांबाबत तपशिलवार माहिती दिली. पर्यटन विकास आणि संवर्धन करणे, ही मुख्यत: राज्य सरकारची जबाबदारी आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार