शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 18:32 IST

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात ...

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचेही खरगे यांनी म्हटलं.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं. निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवरील आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा दूर करणे आवश्यक आहे, हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत, असं खरगे यांनी म्हटलं. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पण दोघेही बैठकीच्या मध्येच निघून गेले. त्यामुळे आता याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

"परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील विधाने यामुळे आपले खूप नुकसान झालं आहे. आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार? प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पक्षाच्या ताकदीतच आमची ताकद आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

यानंतर काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीतून बाहेर पडलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. पक्ष सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असं सांगितले. या बैठकीत ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे खरगे यांनी म्हटलं. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे खरगे म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी हरियाणामध्येही त्यांना आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांतील पक्षांतर्गत गटबाजीवरुन खरगे यांनी, जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा करायचा? असा सवाल केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी