शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
2
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
3
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
4
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
5
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
6
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
7
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
8
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
9
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
10
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
11
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
12
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
13
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
14
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
15
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
17
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
18
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
19
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
20
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
Daily Top 2Weekly Top 5

"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 18:32 IST

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात ...

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचेही खरगे यांनी म्हटलं.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं. निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवरील आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा दूर करणे आवश्यक आहे, हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत, असं खरगे यांनी म्हटलं. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पण दोघेही बैठकीच्या मध्येच निघून गेले. त्यामुळे आता याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

"परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील विधाने यामुळे आपले खूप नुकसान झालं आहे. आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार? प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पक्षाच्या ताकदीतच आमची ताकद आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

यानंतर काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीतून बाहेर पडलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. पक्ष सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असं सांगितले. या बैठकीत ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे खरगे यांनी म्हटलं. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे खरगे म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी हरियाणामध्येही त्यांना आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांतील पक्षांतर्गत गटबाजीवरुन खरगे यांनी, जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा करायचा? असा सवाल केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी