शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

"कठोर निर्णय घ्यावे लागतील"; हरियाणा-महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर खरगेंची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 18:32 IST

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात ...

Congress CWC Meeting: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा केली. निवडणुकीच्या निकालातून धडा घेऊन कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे खरगे यांनी बैठकीत स्पष्ट केले. जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि उणिवा दूर कराव्या लागतील. तीन राज्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नसल्याचेही खरगे यांनी म्हटलं.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य केलं. निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवरील आपल्या सर्व कमकुवतपणा आणि उणिवा दूर करणे आवश्यक आहे, हे निकाल आपल्यासाठी संदेश आहेत, असं खरगे यांनी म्हटलं. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. पण दोघेही बैठकीच्या मध्येच निघून गेले. त्यामुळे आता याबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत.

"परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील विधाने यामुळे आपले खूप नुकसान झालं आहे. आपण शिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही आणि एकदिलाने निवडणुका लढवणार नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा होणार? प्रत्येकाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करावे. काँग्रेस पक्षाचा विजय हा आमचा विजय आणि पक्षाचा पराभव हा आमचा पराभव आहे, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पक्षाच्या ताकदीतच आमची ताकद आहे," असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं.

यानंतर काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीतून बाहेर पडलेले दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. पक्ष सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे, असं सांगितले. या बैठकीत ईव्हीएमवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे खरगे यांनी म्हटलं. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे खरगे म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधी हरियाणामध्येही त्यांना आश्चर्यकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक राज्यांतील पक्षांतर्गत गटबाजीवरुन खरगे यांनी, जोपर्यंत आपण एकदिलाने निवडणुका लढणार नाही आणि एकमेकांविरोधात वक्तव्ये करणे थांबवत नाही, तोपर्यंत विरोधकांचा पराभव कसा करायचा? असा सवाल केला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी