दिल्लीत गुलाब विकणाऱ्या १० वर्षांच्या चिमुकलीला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जनतेत संतापाची लाट असून आता यावरून राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्ली आज भारताची 'रेप कॅपिटल' बनत चालली असून, ही घटना निर्भया प्रकरणाची दुःखद पुनरावृत्ती आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह बंगालमध्ये येऊन परिवर्तनाच्या गप्पा मारत आहेत. कदाचित ते परिवर्तन आधी भाजपाशासित राज्यांपासून सुरू व्हायला हवं. ज्या सरकारमध्ये महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची क्षमता नाही, जे सरकार शुद्ध हवा-पाणी देऊ शकत नाही किंवा स्फोट रोखू शकत नाही, दिल्ली सांभाळता येत नाही, त्या सरकारला बंगालमध्ये येऊन मतं मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही."
दिल्लीतील ट्रॅफिक सिग्नलवर एक अल्पवयीन मुलगी गुलाब विकायची. एका ई-रिक्षा चालकाने या १० वर्षांच्या मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर तिला चहाच्या बहाण्याने बिलकापूर नावाच्या परिसरातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला बेशुद्धावस्थेत सोडून आरोपी पसार झाला होता. ही घटना १० जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस तपासात पीडितेने सांगितलं की, आरोपीने तिला जंगलात नेऊन एका खोलीत तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता रक्ताच्या थारोळ्यात आणि बेशुद्ध पडली होती, ती मेली आहे असे समजून आरोपी तिथून पळून गेला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने कसाबसा आपला घरचा रस्ता गाठला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
Web Summary : Abhishek Banerjee criticized Modi and Shah regarding a Delhi rape case. He questioned their moral authority to seek votes in Bengal when they cannot ensure safety in BJP-ruled states. He cited the Delhi rape as a tragic repeat of Nirbhaya case.
Web Summary : अभिषेक बनर्जी ने दिल्ली बलात्कार मामले को लेकर मोदी और शाह की आलोचना की। उन्होंने भाजपा शासित राज्यों में सुरक्षा सुनिश्चित करने में विफल रहने पर बंगाल में वोट मांगने के उनके नैतिक अधिकार पर सवाल उठाया। उन्होंने दिल्ली बलात्कार को निर्भया मामले की दुखद पुनरावृत्ति बताया।