शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

“पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काँग्रेस-भाजपाला पराभूत करायचे आहे”; ममता बॅनर्जींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:41 IST

TMC Mamata Banerjee News: राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या भागातून गेली, तेथील एका भागात ममता बॅनर्जी यांनी बैठक घेत काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या, असे सांगितले जात आहे.

TMC Mamata Banerjee News: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये सामील पक्षांमधील दरी वाढताना दिसत आहे. आताच्या घडीला पश्चिम बंगाल, बिहार येथून भारत जोडो न्याय यात्रा जात आहे. विशेष म्हणजे ज्या भागातून भारत जोडो न्याय यात्रा गेली, तेथील एका भागात जाऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस, सीपीआयएम आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी तयार राहावे, अशा सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला. यानंतर आता काँग्रेस आणि तृणमूलमधील चर्चेची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. राहुल गांधी यांच्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पदयात्रा काढली आहे. एका कार्यक्रमात बोलताना, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यातील लोकांच्या हक्कांसाठी लढत आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-सीपीआय(एम)-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र राहायला हवे, असे सांगत तृणमूलच्या विजयाचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचा पलटवार

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला. जर पश्चिम बंगालमध्ये चोरी होत असेल, तर ती होत नाही असे कसे म्हणता येईल? भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना आपण भ्रष्ट म्हणू शकत नाही का? असा खोचक सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. 

दरम्यान, स्वबळावर लोकसभा निवडणुका लढवण्याच्या निर्णयाबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, इंडिया आघाडीने माझा एकही प्रस्ताव स्वीकारलेला नाही. अशा स्थितीत आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही पक्षात समन्वय नाही. एवढेच नाही तर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेसाठी निमंत्रित करण्यात आलेले नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस