शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

त्यावेळी पाकिस्तानने जिनिव्हा अॅक्टचे उल्लंघन करून भारतीय वैमानिकाची केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 8:13 PM

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे.

नवी दिल्ली - भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. मात्र जिनिव्हा कायद्याचे संरक्षण असल्याने युद्धबंदी असलेल्या भारतीय वैमानिकाच्या सुटकेची भारताला आशा आहे. पण पाकिस्तानच्या पूर्वोतिहासामुळे काही प्रमाणात चिंताही आहे. त्याचे कारण म्हणजे 1999 च्या कारगील युद्धा वेळी विमान कोसळून पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडलेल्या एका भारतीय वैमानिकाची पाकिस्तानने हत्या केली होती. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा असे त्यांचे नाव होते. 1999 साली भारत आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये कारगिलमध्ये झालेल्या युद्धावेळी भारतीय हवाई दलाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर राबवून पाकिस्तानी घुसखोरांचे कंबरडे मोडले होते. त्या दरम्यान स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांच्याकडे भारतीय हद्दीत लपलेल्या पाकिस्तानी सैनिकांची पोझिशन शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र या मोहिमेदरम्यान 27 मे रोजी त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडून कोसळले. यावेळी विमानातून पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडलेले आहुजा पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. मात्र त्यांना युद्धकैद्यासारखी वर्तणूक न देता पाकिस्ताननी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. पाकिस्तानने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना जिन्हिवा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र आहुजा यांचा मृत्यू विमानातून पडून झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण आहुजा यांची हत्या झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते. भारत सरकारने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना मरणोपरांत वीर चक्र देऊन सन्मानित केले होते.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPakistanपाकिस्तान