शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

CoronaVirus News : "कोरोना चाचण्यांमध्ये हेराफेरी, रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप"

By सायली शिर्के | Published: October 29, 2020 11:41 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 80,40,203 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 49,881 नवे रुग्ण आढळले असून 517 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,20,527 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कोरोना चाचणी लॅब असलेल्या थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला आहे. 

कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए. वेलुमणी यांनी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोनाची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला आहे. "सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे" असं म्हटलं आहे. 

थायरोकेअरच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला गंभीर आरोप

"आम्हाला विविध राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमुने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही खोटा पॉझिटिव्ह रिपोर्ट सादर करत असल्याचा दावा केला जात आहे" अशी माहिती ए. वेलुमणी यांनी दिली आहे. थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील कोरोनाग्रस्तांचे नमुने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येत आहे. 

"कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील उद्देश"

"दररोज कमीतकमी 100 जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमुने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांतांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी 30 टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे" अशी माहिती वेलुमणी यांनी दिली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मेट्रोपोलीस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महामारीमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. "जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकीच कोरोनाग्रस्तांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो" असंही शाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत