शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

अब्जावधी वर्षांपूर्वी भारत होता अंटार्टिकाचा भाग

By admin | Published: August 05, 2016 4:28 AM

भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले

कोलकाता : भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे दोन्ही भूभाग मिळून एकच विशाल खंड होता. मात्र, मानव उत्पत्तीपूर्वी प्रस्तरांच्या उलथापालथीमुळे ते एकमेकांपासून वेगळे व पुन्हा एकजीव होण्याची क्रिया अनेकदा घडल्याचे मानले जाते. भारत व स्वीत्झर्लंडचे भूवैज्ञानिक पृथ्वीचे कवच कसे विकसित झाले यावर संशोधन करीत आहेत. त्यांनी भारतीय उपखंडाच्या पूर्व घाटातील प्राचीन दगडांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना या उपखंडाच्या निर्मितीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. अंटार्टिका खंड व भारतीय उपखंड मिळून कधीकाळी एकच विशाल खंड होता. दीड अब्ज वर्षांपूर्वी त्याचे विभाजन झाल्याचे गृहीतक असून, ते सिद्ध करणे आम्हाला पहिल्यांदाच शक्य झाले आहे, असे आयआयटी खरगपूरचे भूवैज्ञानिक देवाशिष उपाध्याय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)>अशी झाली पृथ्वीवरील उलथापालथभारत आणि अंटार्टिका एकच होते. त्यांना समुद्राने वेगवेगळे केले. पुढे विशाल भूभागाच्या हालचालींमुळे समुद्र बंद होऊन ते पुन्हा संपर्कात आले. एक अब्ज वर्षांपूर्वी ते एकमेकांवर आदळून पुन्हा वेगळे झाले. याच उलथापालथीतून पूर्व घाटातील पर्वतराजी तयार झाली आहे. वेगळे झाल्यानंतर या दोन खंडांत आधी ज्या ठिकाणी जुना समुद्र होता तेथेच पुन्हा नवा समुद्र तयार झाला. हे संशोधन एल्सवायर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वेगळे झालेल्या या खंडांची ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पुन्हा धडक होऊन पूर्व घाटांत पर्वतांची आणखी एक शृंखला निर्माण झाली.या पर्वतराजीचा काही भाग पूर्व घाटांत व काही मॅडागास्करमध्ये आहे. मॅडागास्कर एकेकाळी भारतीय उपखंडाचा एक भाग होता, असे स्वीत्झर्लंडच्या बर्न विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रोफेसर क्लॉस मेझगर यांनी सांगितले. शेवटच्या धडकेनंतर भारत- अंटार्टिका पुन्हा वेगळे झाले आणि आता त्यांच्यात महासागर आहे. पृथ्वीच्या इतिहासात हे दोन्ही खंड अनेकदा एकजीव आणि वेगळे झाल्याचे संशोधन अहवालात म्हटले आहे.