शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'हा सनातनचा अपमान'; लालू प्रसाद यादवांच्या विधानावर भाजपचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:38 IST

लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्याबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल बोलताना लालू प्रसाद यादवांनी हे विधान केलं होतं. 

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना महाकुंभ मेळ्याबद्दल एक विधान केले. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना लालूंनी महाकुंभ अर्थहीन असल्याचे म्हटले होते. त्यावरून भाजपने टीका केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. शनिवारी धावपळ झाल्याने चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना लालू प्रसाद यादव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली. 

लालू प्रसाद यादव महाकुंभबद्दल काय बोलले?

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याबद्दल लालू प्रसाद यादव यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाकुंभ मेळ्यात प्रचंड गर्दी होत असल्याच्या मुद्द्यावर लालू प्रसाद यादव म्हणाले, 'अरे या सगळ्या कुंभचा काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे.'

रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे -लाल प्रसाद यादव

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना लालू प्रसाद यादव म्हणाले, 'खूपच वाईट घटना घडली आहे आहे. सगळ्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे. रेल्वेच्या अव्यवस्थापनामुळे आणि हलगर्जीपणामुळे इतक्या लोकांचा जीव गेला. या घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे', अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली. 

लालू प्रसाद यादव यांच्या भाजपची टीका

भाजपचे नेते शाहनवाज हुसैन यांनी लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभबद्दल केलेल्या विधानावर टीका केली. 'लालू प्रसाद यादव यांनी सनातनचा अपमान केला आहे. त्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर इतकी मोठी दुर्घटना घडली. अनेक लोकांचे जीव गेले. पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. लालू प्रसाद यादव यांच्यासह संपूर्ण विरोधकांनी संवेदनशील होऊन बोललं पाहिजे', असे भाजपचे नेते हुसैन म्हणाले. 

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा