शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 20:33 IST

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबरकसून मैदानात उतरलेले आहेत. प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. "2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. यात सामना 'विकासासाठी मत' आणि ‘जिहादसाठी मत’ असा आहे. एवढेच नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारतीय गॅरंटी’ आणि राहुल गांधी यांची ‘चिनी गॅरंटी’ यात आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी तेलंगणातील भोनगीर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेला संबोधित करत होते. 

काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (AIMIM) यांना 'तुष्टीकरणाचे त्रिकूट' संबोधत शाह म्हणाले, "हे पक्ष रामनवमीच्या मिरवणुका काढू देत नाहीत, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करतात आणि हैदराबाद मुक्ती दिनही (17 सप्टेंबर) साजरा करू देत नाहीत. शरियत आणि कुराणच्या आधारे तेलंगण चालवण्याची यांची इच्छा आहे."

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत भाजप सुमारे 200 जागा जिंकेल, असा दावाही यावेळी शाह यांनी केला. ते म्हणाले, "पक्षाला 400 जागांचे लक्ष्य पार करण्यासाठी तेलंगणाला मतदान करावे लागेल. 2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 पैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीत भाजप 10 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी समजून घ्यायला हवे. तेलंगणातील दोन अंकी जागा पंतप्रधान मोदींना 400 पार घेऊन जाईल."

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे. भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण संपवेल आणि एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवेल. मोदी जे बोलतात ते करतात. राहुलबाबांची गॅरंटी सूर्यास्तापर्यंतही टिकत नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणा