शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 20:33 IST

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबरकसून मैदानात उतरलेले आहेत. प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. "2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. यात सामना 'विकासासाठी मत' आणि ‘जिहादसाठी मत’ असा आहे. एवढेच नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारतीय गॅरंटी’ आणि राहुल गांधी यांची ‘चिनी गॅरंटी’ यात आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी तेलंगणातील भोनगीर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेला संबोधित करत होते. 

काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (AIMIM) यांना 'तुष्टीकरणाचे त्रिकूट' संबोधत शाह म्हणाले, "हे पक्ष रामनवमीच्या मिरवणुका काढू देत नाहीत, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करतात आणि हैदराबाद मुक्ती दिनही (17 सप्टेंबर) साजरा करू देत नाहीत. शरियत आणि कुराणच्या आधारे तेलंगण चालवण्याची यांची इच्छा आहे."

आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत भाजप सुमारे 200 जागा जिंकेल, असा दावाही यावेळी शाह यांनी केला. ते म्हणाले, "पक्षाला 400 जागांचे लक्ष्य पार करण्यासाठी तेलंगणाला मतदान करावे लागेल. 2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 पैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीत भाजप 10 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी समजून घ्यायला हवे. तेलंगणातील दोन अंकी जागा पंतप्रधान मोदींना 400 पार घेऊन जाईल."

शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे. भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण संपवेल आणि एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवेल. मोदी जे बोलतात ते करतात. राहुलबाबांची गॅरंटी सूर्यास्तापर्यंतही टिकत नाही."

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणा