शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

 भाजपा, काँग्रेसविरोधात तिसरी आघाडी, ममता-केसीआर यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 8:31 PM

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात  विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेसविरोधात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे.

कोलकाता - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वात बलाढ्य झालेल्या भाजपाविरोधात  विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी जंग जंग पछाडत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेसविरोधात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली आहे. सोमवारी कोलकाता येथे झालेल्या बैठकीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांविरोधात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहे.  

तृणमुक काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत चर्चा केली. देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या चर्चेनंतर ही एक चांगली सुरुवात असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. " मला वाटते राजकारण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली तिचे केंद्र देशाचा विकास हे होते. राजकारण तुम्हाला अशा स्थितीमध्ये आणते, जिथे तुम्हाला विविध प्रकारच्या लोकांसोबत काम करावे लागते."असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तर स्वत:ला राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी तिसरी आघाडी ही सामुहिक नेतृत्व असल्याचे सांगितले."हे एक सामुहिक आणि संघीय नेतृत्व असेल, ज्यामध्ये सगळे जण एकत्र असतील. 2019 पूर्वी एक तिसरी आघाडीही तयार होईल, असे लोकांना वाटत आहे. मी स्पष्टपणे सांगतो की ही तिसरी आघाडी देशातील जनतेसाठी असेल," असे चंद्रशेखर राव म्हणाले. 

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी