शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पश्चिम बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार; भाजप नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:27 IST

Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप आता इतर राज्यांतही पोहोचू लागला आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या रविवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजितदादांसह नऊ जणांनी भाजपा शिवसेना युतीसरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उर्वरित बंडखोर आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप आता इतर राज्यांतही पोहोचू लागला आहे. 

आगामी काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचाही शरद पवारांप्रमाणेच 'खेला' होऊ शकतो, असा दावा पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, "शरद पवारांना आपल्या मुलीला राजकारणात आणायचे होते. त्यामुळे पक्षाचे जुने दिग्गज नेते आणि अजित पवार नाराज झाले. त्यामुळे ते एनडीएमध्ये सहभागी झाले. अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांना आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना राजकारणात आणायचे आहे. त्यामुळे स्वत:च्या हाताने पक्ष वाढवणारे तृणमूल काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते नाराज आहेत. या पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव होईल आणि तशा प्रकारे (महाराष्ट्राचे राजकारण) पश्चिम बंगालमध्येही होणार आहे."

महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंडखोरी केली. अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे गट-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या बंडानंतर अजित पवार थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत अन्य ९ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ३० पेक्षा अधिक आमदार असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी या अजित पवारांसह नऊ आमदारांच्या बंडाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी सोमवारी(दि.३) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. तसेच बंड केलेल्या नेत्यांविरोधात रणशिंग फुंकले आहे. याआधी अजित पवार यांनी २०१९ च्या सुरुवातीला अशाच प्रकारचे बंड केले जाते. त्या बंडाला महाराष्ट्राच्या राजकारणात 'पहाटेचा शपथविधी' म्हणून ओळखले जाते. तेव्हा अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांचे बंड अवघ्या तीन दिवसांत मोडून काढले होते. तेव्हा सुद्धा भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष