शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

CAA: घुसखोर अन् निर्वासितांमधील फरकही त्यांना माहितीच नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 05:21 IST

या मुद्द्यावर ममतांना पाठिंबा मिळणार नाही, रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांबद्दल माैन का?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिक सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. त्यांना निर्वासित आणि घुसखोर यांच्यातील फरकही माहीत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली. ‘मी ममता बॅनर्जींना आवाहन करतो की, राजकारण करण्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. बांगलादेशातून येणाऱ्या बंगाली हिंदूंना कृपया विरोध करू नका. तुम्हीही बंगाली आहात,’ असे शाह मुलाखतीत म्हणाले.

एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सीएएला मुस्लीम विरोधी म्हटले आहे. यावर गृहमंत्री म्हणाले, ‘हा भाजपचा राजकीय खेळ नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या लोकांना समान अधिकार देण्याची जबाबदारी आमचे नेते नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारची आहे. भारतातील अल्पसंख्याकांनी काळजी करण्याची गरज नाही, असे मी अलीकडे ४१ वेळा सांगितले आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणार नाही. 

‘निर्वासितांना दुसऱ्या जागी हलविणार नाही’

- पाकिस्तानातून स्थलांतरित होऊन जे हिंदू दिल्लीतील मंजू का टिला भागात राहत आहेत, त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी असलेली नोंदणी प्रक्रिया दिल्ली उच्च न्यायालयात १९ मार्च किंवा त्यानंतर उपस्थित राहून पूर्ण करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे. 

- ही माहिती या निर्वासितांपैकी एक असलेले धर्मेश्वर सोळंकी यांनी गुरुवारी दिली. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार नाही.

रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांबद्दल माैन का? 

या कायद्यामुळे निर्वासितांना नागरिकत्व मिळेल, हे धोकादायक आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल. लुटमार व चोरीच्या घटना वाढतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. यावर शाह म्हणाले की, केजरीवाल यांना माहीत नाही की हे लोक निर्वासित असून २०१४ पूर्वीपासून येथे राहत आहेत. केजरीवाल हे बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत? असा सवालही शाह यांनी केला.

‘सीएए आसामसाठी अजिबात उपयोगी नाही’

- सीएए हा कायदा आसामसाठी अजिबात उपयोगी नाही असे त्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले. या राज्यातून निर्वासितांचे अगदी कमी प्रमाणात भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याचा त्यांनी दावा केला. 

- जनतेने प्रश्न सोडविण्यासाठी शांततामय मार्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहन आसामचे पोलिस महासंचालक जी.पी. सिंह यांनी केले आहे. सीएए कायद्याविरोधात आसाममध्ये निदर्शने करणाऱ्या विविध संघटनांना त्यांनी हे आवाहन केले आहे.

सीएए कायद्याविरोधात केलेल्या विधानांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी करत हिंदू, शीख निर्वासितांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी निदर्शने केली. हे निदर्शक चंडीग्राम आखाडा भागात जमले व केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा घेऊन निघाला असताना पोलिसांनी वाटेतच त्यांना रोखले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४