शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातही गोंधळ होणार

By admin | Updated: April 23, 2016 02:42 IST

येत्या सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र प्रचंड गदारोळातच पार पडणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संयुक्त डावपेच आखण्यासाठी

शीलेश शर्मा, नवी दिल्लीयेत्या सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र प्रचंड गदारोळातच पार पडणार अशी चिन्हे आहेत.काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संयुक्त डावपेच आखण्यासाठी विचारविनिमय सुरू केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह सर्व मोठ्या नेत्यांसोबत या मुद्यावर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी इशरत जहाँ बनावट चकमकीचा मुद्दाही समोर आला. भाजपा या आधारेच काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस त्याच्या प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करेल. तसेच न्यायालयातील निर्णयांच्या आधारे तत्कालीन केंद्र सरकारचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संबंध नव्हता. ही गुजरातेतील घटना असून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि शहा यांनी ती दाबण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करेल. याशिवाय इतर विरोधी पक्षांच्या सहकार्याने संयुक्त डावपेच आखून उत्तराखंड व अरुणाचलच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) गैरवापरावरून काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष दोन्ही सभागृहात गोंधळ घालतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बचावाकरिता सरकार तपास संस्थेवर दबाव आणत असल्याचा आरोप यावेळी केला जाईल. सरकारचीही जय्यत तयारीकाँग्रेससह संपूर्ण विरोधकांच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सरकारनेही जय्यत तयारी सुरू केली आहे. अरुण जेटली, वेंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांना विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पूर्वतयारी करण्यास सांगण्यात आले आहे. कोण कुठल्या मुद्याला उत्तर देणार याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. रविवारी सायंकाळी भाजपा नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी या मुद्यावर अंतिम निर्णय घेतील. अरुणाचल आणि उत्तराखंडमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रश्नावर सरकार संभ्रमात आहे. कारण या मुद्यावर कुठलाही मित्र पक्ष सरकारच्या सोबत नाही. यापूर्वी प्रत्येक वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहणारे शिवसेना, अण्णाद्रमुक, तेलगू देसम पार्टी, बीजू जनता दलसारखे पक्ष मोदी सरकारच्या या निर्णयांना विरोध करीत आहेत.