ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:51 IST2025-11-17T19:35:48+5:302025-11-17T19:51:08+5:30

बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या दारुण पराभव झाला. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दावा ईव्हीएमवरुन नवीन दावा केला.

There were already 25,000 votes in the EVMs, yet 25 candidates of our party won; RJD's Jagadanand's big claim | ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा

ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा

बिहार निवडणुकीत आरजेडीसह महाआघाडीचा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला. निकालानंतर, आरजेडीने सोमवारी पहिली आढावा बैठक घेतली. तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि खासदार मीसा भारती यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर, राजदचे माजी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी मोठा दावा केला.'प्रत्येक ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती. तरीही, जर आमचे २५ आमदार जिंकले तर ते भाग्य आहे',असा दावा सिंह यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी

यावेळी जगदानंद सिंह यांनी विचारले, "तुम्हाला आरजेडीची अशी अवस्था होईल अशी अपेक्षा होती का? पण परिस्थिती बदलण्यासाठी हे उपाय केले गेले. हे देशाचे दुर्दैव आहे. देश कुठे चालला आहे? लोकशाही हा व्यवसाय आहे का? लोक व्यवसायात फसवणूक करतात. लोकशाही ही एक संवैधानिक प्रक्रिया आहे. जेव्हा संविधानाचीच फसवणूक होत असेल, तेव्हा देश टिकेल का?" असा सवाल सिंह यांनी केला.

यावेळी बैठकीला उपस्थित असलेले मानेरचे आमदार भाई वीरेंद्र म्हणाले की, नवनिर्वाचित आमदारांनी तेजस्वी यादव यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. "आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आम्ही काम करू," असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे. "आम्ही मतपत्रिकेमुळे निवडणूक जिंकली, पण ईव्हीएममुळे हरलो."
 

Web Title : ईवीएम में पहले से वोट थे; फिर भी आरजेडी जीती: जगदानंद

Web Summary : बिहार चुनाव में हार के बाद आरजेडी का आरोप: ईवीएम में पहले से वोट थे, फिर भी 25 सीटें जीतीं। जगदानंद सिंह ने लोकतंत्र और संविधान पर सवाल उठाए। ईवीएम घोटाले के खिलाफ लड़ने का वादा किया।

Web Title : RJD leader claims EVMs had votes; party still won seats.

Web Summary : RJD alleges EVMs pre-programmed with votes after Bihar election defeat. Despite this, RJD won 25 seats. Party questions democracy, constitution's integrity, and EVM fairness. Leaders vow to fight alleged EVM fraud.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.