शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

युपीत गेल्या दोन वर्षांत एकही दंगल नाही - योगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:22 AM

आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली

लखनऊ : आमच्या सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत एकही दंगल झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. या राज्याची माफियाराज अशी असलेली प्रतिमा माझ्या सरकारने बदलली असून राज्यातील कायदा, सुव्यवस्थेची उत्तम स्थिती ही इतरांसाठी आदर्श ठरली आहे असे ते मुलाखतीत म्हणाले.सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कालावधीत केलेल्या कामांची माहिती देताना ते म्हणाले की, मी मार्च २०१७मध्ये सत्तासूत्रे स्वीकारण्याआधी उत्तर प्रदेशमध्ये कर्जाने दबलेले शेतकरी आत्महत्या करत होते. हे राज्य हत्या, लुटालूट व दंगली यांनी त्रस्त होते. सपा-बसपा यांच्या सरकारांच्या काळात राजकीय पाठबळ असल्याने माफिया सरकारी साधनांची लूट करत होते. त्यांनी अनेक घोटाळे केले. त्यामुळे कलंकित झालेली राज्याची प्रतिमा माझ्या सरकारच्या काळात सुधारली आहे.दावे व वास्तवात अंतर - प्रियांका गांधीउत्तर प्रदेशमधील आदित्यनाथ सरकारने राज्यातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे जे दावे केले आहेत, त्यापेक्षा वास्तव वेगळे व भयानक आहे असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रयागराज ते वाराणसी या गंगायात्रेच्या दुसऱ्या दिवशी लोकांशी संवाद साधत होत्या.गेल्या ७0 वर्षांत या देशात काहीच प्रगती झाली नाही अशी शेखी मिरविण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत, असा टोलाही प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक