नवी दिल्ली: काँग्रेसच्या महासचिव आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार महागाई, बेरोजगारी आणि एलपीजी संकटासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशात असा एकच नेता आहे, जो गेल्या 12 वर्षांत सरकारसमोर कधीही झुकला नाही आणि तो म्हणजे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहे.
सरकार महत्त्वाच्या मुद्द्यांपासून पळते
प्रियंका पुढे म्हणतात, राहुल गांधी या सभागृहात उभे राहून निर्भीडपणे सत्य बोलतात. मात्र ते सत्य सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही. त्यांना थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला आणि सोशल मीडियावर मोहिमा राबवण्यात आल्या. पण सत्य सर्वांसमोर आहे. लोक पाहत आहेत की, राहुल गांधी सत्य बोलण्यापासून मागे हटत नाहीत. त्यामुळे सत्तेत बसलेल्यांना त्यांच्या आवाजाची भीती वाटते.
भविष्यात संकट वाढू शकते
प्रियंका गांधी यांनी इशारा दिला की, देशासमोर येत्या काळात मोठे संकट उभे राहू शकते. देशातील मोठ्या प्रमाणावरची संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात दिली जात आहे. या संदर्भात प्रश्न विचारल्यास सरकारकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही. संसदेत वंदे मातरम, नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्याबाबत चर्चा होते; मात्र महागाई, बेरोजगारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार करारांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. देशातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहेत, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अमेरिका व्यापार करारावरही प्रश्न
प्रियंका गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, या करारात भारताने अमेरिकेसमोर झुकल्याचे दिसते. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाची परिस्थिती निर्माण होत असल्याने देशावर आर्थिक आणि ऊर्जा संकट वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रियंकांनी यावेळी देशातील एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किंमती आणि कमर्शियल गॅसच्या तुटवड्याचा मुद्दाही उपस्थित केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आधीच सरकारला ऊर्जा संकटाबाबत इशारा दिला होता. आता देशात एलपीजी सिलेंडरची कमतरता आणि वाढत्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
Web Summary : Priyanka Gandhi criticized the Modi government for avoiding discussions on key issues. She praised Rahul Gandhi as the only leader unafraid to speak truth to power, despite facing opposition. Gandhi warned of impending economic and energy crises, questioning trade deals and rising LPG prices.
Web Summary : प्रियंका गांधी ने मोदी सरकार पर महत्वपूर्ण मुद्दों से बचने का आरोप लगाया। उन्होंने राहुल गांधी को एकमात्र ऐसा नेता बताया जो सत्ता के सामने सच बोलने से नहीं डरते। गांधी ने आर्थिक और ऊर्जा संकट की चेतावनी दी, व्यापार सौदों और एलपीजी की बढ़ती कीमतों पर सवाल उठाए।