शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"मिस इंडियाच्या यादीत कुणीच दलित, आदिवासी, OBC नाही’’, राहुल गांधींचा दावा, भाजपाची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 15:35 IST

Rahul Gandhi: मिस इंडियाच्या (Miss India) विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा त्यामध्ये मला कुणी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी नावं दिसली नाहीत, असं विधान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं होतं. आता या विधानाविरोधात भाजपानं (BJP) आक्रमक भूमिका घेतली होती. आता राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

आरक्षण आणि जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कमालीचे आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, नुकतंच एका कार्यक्रमामध्ये संबोधित करताना राहुल गांधी यांनी मिस इंडियाच्या विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा त्यामध्ये मला कुणी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी नावं दिसली नाहीत, असं विधान केलं होतं. आता या विधानाविरोधात भाजपानं आक्रमक भूमिका घेतली होती. आता राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांचं विधान हे फुटीरतावादी आणि खोटारडेपणाचं असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक फोटो काँग्रेसला टॅग करून यामधील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील एक तरी व्यक्ती शोधून दाखवा, असं आव्हान दिलं आहे.  

या विधानावरून राहुल गांधींवर टीका करताना अमित मालवीय यांनी बालकबुद्धीचं राजकारण ही एक फसवणूक आहे, असा टोला लगावला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यात ते म्हणाले की, आता राहुल गांधी यांना मिस इंडिया, चित्रपट, खेळ यामध्येही आरक्षण हवं आहे का, हा केवळ बालबुद्धीचा मुद्दा नाही तर जे त्यांना प्रोत्साहन देतात, तेसुद्धा यासाठी जबाबदार आहेत. 

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, मी मिस इंडियाची यादी पाहिली. त्यामध्ये कुणीही दलित, आदिवासी किंवा ओबीसी महिला नाही आहे. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबाबत बोलतील. कुणी मोची किंवा प्लंबरला दाखवणार नाही. एवढंच नाही तर प्रसारमाध्यमांमधील आघाडीच्या अँकर्समध्येही ९० टक्क्यांमधील कुणी नाही आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.

तर भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एका महिलेला विजेतेतेपदाचा मुकूट प्रदान करतानाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, दोन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील एक आदिवासी युवती, मिस रिया एक्का हिने मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. राहुल गांधी सध्या खेळत असलेला डाव हा फुटिरतेकडे जाणारा आणि खोटारडेपणाचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाMiss Indiaमिस इंडियाbollywoodबॉलिवूड