शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आता सत्तासंघर्षाचा निकाल; सात सदस्यीय घटनापीठाचा निर्णय ‘योग्यते’वर होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 10:20 IST

सत्तासंघर्ष, पुढील सुनावणी २१ राेजी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : योग्यतेच्या आधारावर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची याचिका ७ सदस्यीय घटनापीठाकडे द्यायची काय? यावर विचार केला जाईल. यासाठी येत्या २१ फेब्रुवारीला ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होईल, असा निर्णय आज सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी दिला. यामुळे हा खटला सात सदस्यीय खंडपीठाकडे जाईल, की नाही, याचा खुलासा होण्यास पुन्हा काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करण्यात आले. हा खटला नबाम रेबिया निकालाच्या  संदर्भात विचारात घेतला पाहिजे, या मुख्य युक्तीवादावर सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी गुरुवारला निर्णय राखून ठेवला होता. आज सकाळी या संदर्भात निर्णय देताना सरन्यायाधीशांनी सात सदस्यीय खंडपीठाकडे प्रकरण सोपविण्यास तूर्तास नकार दिला, तरी दरवाजा बंद केलेला नाही. येत्या २१ फेब्रुवारीला होणार्या युक्तीवादा दरम्यान ‘योग्यतेच्या आधारा’वर या प्रकरणाचा नबाम रेबिया निकालासंदर्भात पुनर्विचार करावा का? याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. नबाम रेबिया प्रकरण हे अरुणाचल प्रदेशमध्ये २०१६ मध्ये  उद्भवलेल्या राजकीय संकटाशी संंबंधित आहे. ठाकरे-शिंदे वादाचा विचार हा या प्रकरणाच्या संदर्भातच घेतला जाईल, यावर स्वतंत्र विचार हाेणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

शिंदे गटाच्या १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी जून महिन्यात अपात्रतेची नोटीस बजावली होती. या नोटीसला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै २०२२ पर्यंत वाढविली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी २९ जून  राेजी राजीनामा दिल्याने ठाकरे सरकार कोसळले. 

काय आहे नबाम रेबिया प्रकरणnनबाम रेबिया हे अरुणाचल प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष होते. मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या विरोधात काँग्रेसच्या २१ आमदारांनी बंड केल्यानंतर नबाम रेबिया यांनी या सर्वांना अपात्रतेची नोटीस बजावली. यानंतर काही आमदारांनी रेबिया यांच्या हटविण्याची नोटीस दिली. nहटविण्यासाठी नोटीस दिलेली असताना विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर निर्णय घेऊ शकत नाही, असा निर्णय २०१६ मध्ये पाच सदस्यीय घटनापीठाने दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ सदस्यांनाअपात्रतेची नोटीस बजावली. nयानंतर शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानसभा उपाध्यक्षांनाच हटविण्यासाठी नोटीस दिली. त्यासाठी नबाम रेबिया निकालाचा संदर्भ आमदारांच्या वतीने देण्यात आला. 

१०व्या अनुसूचीतील तरतुदींकडे वेधले लक्षयाचवेळी राज्यघटनेतील १० व्या अनुसूचीच्या तरतुदींकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे. मूळ पक्षातून फुटून निघालेल्या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते, अशी १० व्या अनुसूचीत तरतदू आहे. याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गट दुसर्या पक्षात विलीन झालेला नाही. यामुळे पीठासीन अधिकार्याचा घटनात्मक अधिकार, १० व्या अनुसूचीतील तरतूद तसेच राज्यपालांच्या अधिकारावर न्यायीक पुनर्विचार होण्याची गरज असल्याने या याचिकेची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे व्हावी, हा ठाकरे गटाचा मुख्य युक्तीवाद आहे.

टॅग्स :Courtन्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना