शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 08:57 IST

जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली: भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी प्रादेशिक आणि जागतिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार असून बदलत्या काळानुसार दोन्ही देश त्यांच्या संबंधांमध्ये नवीन क्षितिजे जोडत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागिदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात चर्चा झाली. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. 

भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागीदारी परिषदेची घोषणा २०१९ मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. चर्चेपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सौदी अरेबियाच्या राजकुमारांचे अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. जी-२० शिखर परिषद ही भारतासाठी मोठ्या यशाची शिखर परिषद होती. या शिखर परिषदेमुळे अनेक देशांशी जवळीक वाढली आहे, या यादीत पहिले नाव सौदी अरेबियाचे आहे. 

भारत आणि सौदी अरेबियाच्या मैत्रीमुळे चीन आणि पाकिस्तानची आतून घुसमट होत आहे. कारण या दोन देशांच्या वाढत्या जवळीकांमुळे आपण कुठेतरी दूर जाऊ शकतो, असे पाकिस्तानला वाटत आहे. अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात जी जवळीक वाढली आहे, त्याचा प्रभाव जगातील अनेक मोठ्या मंचांवर दिसून येत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ साली अशी दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.

महाराष्ट्रात ४४०० कोटी रुपयांचा ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प’ उभारण्याची तयारी सुरू असून, त्यात सौदी अरेबियाची अरामको, अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि भारताची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एकत्र काम करत आहेत. अलीकडेच सौदी अरेबियाने येत्या ५ वर्षांत पाकिस्तानमध्ये २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. पण भारताशी वाढत्या जवळीकमुळे सौदी अरेबिया आपला निर्णय फिरवू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. कारण सौदी अरेबियाने या मुद्द्यावर दीर्घकाळ मौन बाळगले आहे.

आमची घनिष्ठ भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आजची बैठक आमच्या संबंधांना नवी दिशा आणि ऊर्जा देईल.'-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जी- २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी भारताचे अभिनंदन. परिषदेत केलेल्या घोषणांचा जगाला फायदा होईल. आम्ही दोन्ही देशांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करू.-मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौंद, सौदी अरेबियाचे राजकुमार

टॅग्स :Indiaभारतsaudi arabiaसौदी अरेबियाPakistanपाकिस्तानchinaचीन