शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 08:57 IST

जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली: भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी प्रादेशिक आणि जागतिक कल्याण आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आहे. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार असून बदलत्या काळानुसार दोन्ही देश त्यांच्या संबंधांमध्ये नवीन क्षितिजे जोडत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागिदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत मोदी आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात चर्चा झाली. त्यादरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. 

भारत-सौदी अरेबिया व्यूहात्मक भागीदारी परिषदेची घोषणा २०१९ मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. चर्चेपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सौदी अरेबियाच्या राजकुमारांचे अधिकृतपणे स्वागत करण्यात आले. जी-२० शिखर परिषद ही भारतासाठी मोठ्या यशाची शिखर परिषद होती. या शिखर परिषदेमुळे अनेक देशांशी जवळीक वाढली आहे, या यादीत पहिले नाव सौदी अरेबियाचे आहे. 

भारत आणि सौदी अरेबियाच्या मैत्रीमुळे चीन आणि पाकिस्तानची आतून घुसमट होत आहे. कारण या दोन देशांच्या वाढत्या जवळीकांमुळे आपण कुठेतरी दूर जाऊ शकतो, असे पाकिस्तानला वाटत आहे. अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी आणि राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौद यांच्यात जी जवळीक वाढली आहे, त्याचा प्रभाव जगातील अनेक मोठ्या मंचांवर दिसून येत आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी संबंध दृढ करण्यावर विशेष भर दिला असून, त्यात सौदी अरेबियासोबतचे संबंध सर्वाधिक सुधारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१६ आणि २०१९ साली अशी दोनदा सौदी अरेबियाला भेट दिली आहे.

महाराष्ट्रात ४४०० कोटी रुपयांचा ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रकल्प’ उभारण्याची तयारी सुरू असून, त्यात सौदी अरेबियाची अरामको, अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी आणि भारताची इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन एकत्र काम करत आहेत. अलीकडेच सौदी अरेबियाने येत्या ५ वर्षांत पाकिस्तानमध्ये २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. पण भारताशी वाढत्या जवळीकमुळे सौदी अरेबिया आपला निर्णय फिरवू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. कारण सौदी अरेबियाने या मुद्द्यावर दीर्घकाळ मौन बाळगले आहे.

आमची घनिष्ठ भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आजची बैठक आमच्या संबंधांना नवी दिशा आणि ऊर्जा देईल.'-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जी- २० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी भारताचे अभिनंदन. परिषदेत केलेल्या घोषणांचा जगाला फायदा होईल. आम्ही दोन्ही देशांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एकत्र काम करू.-मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल-सौंद, सौदी अरेबियाचे राजकुमार

टॅग्स :Indiaभारतsaudi arabiaसौदी अरेबियाPakistanपाकिस्तानchinaचीन