शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
7
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
8
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
9
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
10
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
11
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
12
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
13
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
14
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
15
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
16
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
17
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
18
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
19
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
20
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
Daily Top 2Weekly Top 5

NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:00 IST

Ncert India Partition: भारत पाकिस्तान फाळणीबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, यात तीन व्यक्तींना फाळणीसाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे. 

Ncert on India Pakistan Partition: 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, सहावी ते आठवी आणि नववी ते १२वी दोन मॉड्युल तयार केले गेले आहेत. यात भारत-पाकिस्तान फाळणी कशी झाली आणि कोणत्या नेत्यांनी स्वीकारली, याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेली नाही, यासाठी तीन व्यक्ती, पक्ष जबाबदार होते. यात पहिले होते मोहम्मद अली जिन्ना ज्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. दुसरी होती काँग्रेस अर्थात नेहरू ज्यांनी फाळणी स्वीकारली आणि लॉर्ड माऊंटबॅटन ज्यांनी फाळणी लागू केली. 

एनसीआरटीच्या नव्या मॉड्युलमध्ये फाळणीबद्दल काय?

या पाठ्यक्रमामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी चुकीच्या विचारांमुळे झाली. मुस्लीम लीगने १९४० मध्ये लाहौरमध्ये एक बैठक घेतली होती. तिथे जिन्नांनी म्हटले होते की, हिंदू आणि मुस्लीम वेगवेगळे धर्म आहेत. परंपरा वेगवेगळ्या आहेत. ब्रिटिशांची इच्छा होती की भारत स्वतंत्र व्हावा, पण फाळणी होऊ नये.

सरदार वल्लभभाई पटेलांची काय होती इच्छा?

"भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी फाळणीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते. सरदार वल्लभभाई पटेल हे सुरुवातीला फाळणीच्या बाजूने नव्हते, पण नंतर त्यांनी ही गोष्ट अनिवार्य असलेल्या औषधाप्रमाणे स्वीकारली. १९४७ मध्ये मुंबईतील एका सभेत त्यांनी म्हटले होते की, 'देश युद्धभूमी बनला आहे. दोन्ही समुदाय आता शांततेत राहू शकणार नाही. गृहयुद्ध होण्यापेक्षा फाळणी केलेली बरी."

लॉर्ड माऊंटबॅटन फाळणीबद्दल काय म्हणालेले?

पुस्तकात म्हटले आहे की, भारताचे अखेरचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी म्हटले होते की, 'मी भारताची फाळणी केलेली नाही. याला भारतीय नेत्यांनीच मंजुरी दिली. मी फक्त ती शांतता पूर्ण मार्गाने लागू करण्याचे काम केले. घाई करण्याची चूक माझी होती, पण त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी भारतीयांची होती.'

महात्मा गांधींनी फाळणीला विरोध केला, पण परिस्थिती अशी झाली की नेहरू आणि पटेलांनी गृहयुद्ध भडकण्याच्या भीतीने फाळणी स्वीकारली. महात्मा गांधींनी विरोधी भूमिका सोडली आणि १४ जून १९४७ रोजी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये इतर नेत्यांनाही भारताच्या फाळणीसाठी तयार करण्यात आले. 

काँग्रेसची अभ्यासक्रमावर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर टीका केली आहे. एनसीआरटीच्या मॉड्युलमध्ये पूर्ण सत्य सांगितले गेलेले नाहीये. यात फक्त काँग्रेस आणि जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार ठरवले गेले आहे, हे अर्धसत्य आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानEducationशिक्षणhistoryइतिहासcongressकाँग्रेस