शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
4
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
5
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
6
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
7
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
8
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
10
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
11
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
12
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
13
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
14
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
15
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
16
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
17
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
18
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
19
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
20
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 15:00 IST

Ncert India Partition: भारत पाकिस्तान फाळणीबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, यात तीन व्यक्तींना फाळणीसाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे. 

Ncert on India Pakistan Partition: 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानबद्दल एनसीआरटीने नवीन पाठ्यक्रम तयार केला असून, सहावी ते आठवी आणि नववी ते १२वी दोन मॉड्युल तयार केले गेले आहेत. यात भारत-पाकिस्तान फाळणी कशी झाली आणि कोणत्या नेत्यांनी स्वीकारली, याबद्दलचा उल्लेख करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेली नाही, यासाठी तीन व्यक्ती, पक्ष जबाबदार होते. यात पहिले होते मोहम्मद अली जिन्ना ज्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली. दुसरी होती काँग्रेस अर्थात नेहरू ज्यांनी फाळणी स्वीकारली आणि लॉर्ड माऊंटबॅटन ज्यांनी फाळणी लागू केली. 

एनसीआरटीच्या नव्या मॉड्युलमध्ये फाळणीबद्दल काय?

या पाठ्यक्रमामध्ये म्हटले आहे की, भारताची फाळणी चुकीच्या विचारांमुळे झाली. मुस्लीम लीगने १९४० मध्ये लाहौरमध्ये एक बैठक घेतली होती. तिथे जिन्नांनी म्हटले होते की, हिंदू आणि मुस्लीम वेगवेगळे धर्म आहेत. परंपरा वेगवेगळ्या आहेत. ब्रिटिशांची इच्छा होती की भारत स्वतंत्र व्हावा, पण फाळणी होऊ नये.

सरदार वल्लभभाई पटेलांची काय होती इच्छा?

"भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी फाळणीबद्दल वेगवेगळे मतप्रवाह होते. सरदार वल्लभभाई पटेल हे सुरुवातीला फाळणीच्या बाजूने नव्हते, पण नंतर त्यांनी ही गोष्ट अनिवार्य असलेल्या औषधाप्रमाणे स्वीकारली. १९४७ मध्ये मुंबईतील एका सभेत त्यांनी म्हटले होते की, 'देश युद्धभूमी बनला आहे. दोन्ही समुदाय आता शांततेत राहू शकणार नाही. गृहयुद्ध होण्यापेक्षा फाळणी केलेली बरी."

लॉर्ड माऊंटबॅटन फाळणीबद्दल काय म्हणालेले?

पुस्तकात म्हटले आहे की, भारताचे अखेरचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी म्हटले होते की, 'मी भारताची फाळणी केलेली नाही. याला भारतीय नेत्यांनीच मंजुरी दिली. मी फक्त ती शांतता पूर्ण मार्गाने लागू करण्याचे काम केले. घाई करण्याची चूक माझी होती, पण त्यानंतर झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी भारतीयांची होती.'

महात्मा गांधींनी फाळणीला विरोध केला, पण परिस्थिती अशी झाली की नेहरू आणि पटेलांनी गृहयुद्ध भडकण्याच्या भीतीने फाळणी स्वीकारली. महात्मा गांधींनी विरोधी भूमिका सोडली आणि १४ जून १९४७ रोजी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीमध्ये इतर नेत्यांनाही भारताच्या फाळणीसाठी तयार करण्यात आले. 

काँग्रेसची अभ्यासक्रमावर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर टीका केली आहे. एनसीआरटीच्या मॉड्युलमध्ये पूर्ण सत्य सांगितले गेलेले नाहीये. यात फक्त काँग्रेस आणि जिन्नांना फाळणीसाठी जबाबदार ठरवले गेले आहे, हे अर्धसत्य आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानEducationशिक्षणhistoryइतिहासcongressकाँग्रेस