शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 05:59 IST

एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

नवी दिल्ली : अदानी समूहाशी संबंधित प्रकरणावर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘आपल्यावर जितकी चिखलफेक होईल तितके कमळ फुलेल,’ अशी टीका विरोधकांवर केली. विरोधकांचे विविध मुद्दे त्यांनी सविस्तर खोडून काढले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर गुरुवारी राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्यास पंतप्रधानांनी सुरुवात करताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीसह काही विरोधी पक्षांचे सदस्य व्यासपीठाजवळ आले आणि घोषणाबाजी करू लागले. सदस्यांच्या घोषणाबाजीवर मोदी म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे होता चिखल, माझ्याकडे होता गुलाल. ज्याच्याकडे जे होते, ते त्याने उधळले... बरेच झाले. कारण, तुम्ही जितकी चिखलफेक कराल तितके कमळ फुलेल. त्यामुळे कमळ फुलवण्यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्यांचाही हातभार लागत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’’

पंतप्रधानांनी १ तास २५ मिनिटांच्या आपल्या संपूर्ण भाषणात सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करताना, त्यांच्या यशाची मोजदाद केली आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत आभार प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

काँग्रेसने ९० वेळा सरकारे पाडलीआज जे विरोधी पक्षात बसले आहेत, त्यांनी राज्यांचे अधिकार नष्ट केले होते. इतिहास पाहा, कोणता पक्ष सत्तेत होता ज्याने कलम ३५६ चा सर्वाधिक दुरुपयोग केला. ९० वेळा निवडून आलेली सरकारे पाडली, असे म्हणत मोदींनी उदाहरणादाखल केरळमधील डावे सरकार, तामिळनाडूमध्ये एमजी रामचंद्रन आणि करुणानिधी सरकार, महाराष्ट्रात शरद पवार सरकार, आंध्र प्रदेशातील एनटी रामाराव सरकार यांचा उल्लेख केला. 

भाजप खासदारांना व्हीपकामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपने आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करीत १३ फेब्रु.पर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

काँग्रेसने ६० वर्षांत खड्डेच खड्डे केले२०१४ मध्ये जेव्हा आपण देशाचे पंतप्रधान झालो तेव्हा ६० वर्षांत ‘काँग्रेस परिवाराने’ सगळीकडे खड्डेच खड्डे केलेले दिसले. कदाचित त्यांचा हेतू चांगला असेल; पण खड्डेच खड्डे केले होते. त्यामुळे सहा दशके वाया गेली. त्या काळात जगातील छोटे- छोटे देशही यशाच्या शिखरांना स्पर्श करत होते. पुढे सरकत होते, असे मोदी म्हणाले.

नेहरू आडनाव का ठेवत नाहीत?   एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपला बहुमत असताना जेपीसीची भीती का?बुधवारी दुपारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा मुख्यत: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावर सरकारने ‘बंदी’ घातल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सरकारचे कोविड व्यवस्थापन, महिला आणि वृद्धांचा सन्मान आणि संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व, असे इतर मुद्दे उपस्थित केले गेले.   

मी एकटाच पडतोय सर्वांना भारी... -आपल्या संपूर्ण भाषणात विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ते एका तासाहून अधिक काळ एकटे बोलत आहेत आणि विरोधकांना घोषणा देण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो. मी एकटाच अनेकांवर भारी पडतोय... नारे बदलण्यासाठी त्यांना किती कसरत करावी लागत आहे; पण ते माझा आवाज थांबवू शकले नाहीत.’’ 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस