शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजकारण्यांना छळतोय ‘एमएसपी’चा मुद्दा; शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 20, 2024 14:02 IST

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

चंदिगड : पंजाबमध्ये १३ जागांसाठी लोकसभेचा रणसंग्राम सुरू असून, केंद्रातील सत्ताधारी भाजपसह पंजाबमधील सत्ताधारी आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. २० लाख शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलासोबत असलेल्या भाजपने यावेळी मात्र स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व १३ जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. दुसरीकडे २०१९ मध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला गळती लागल्याने स्वकियांशीच लढावे लागत आहे.

२३ पिकांना कायद्याने एमएसपीची  गॅरंटी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचा सर्वाधिक रोष सत्ताधारी भाजपावर आहे. भाजपाच्या उमेदवारांना प्रचारासाठीही शेतकरी मतदार संघात फिरू देत नसल्याची सध्याचे स्थिती आहे. दुसरीकडे पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीने एमएसपी जाहीर करण्याचे तसेच पीक कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे आपलाही शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांवरही शेतकऱ्यांची नाराजी आहे.

पंजाबमध्ये  २० लाख शेतकरी मतदार आहेत. या अन्नदात्याची नाराजी दूर करण्यासाठी या सगळ्याच पक्षांच्या पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अनेक नेत्यांनी साेडली काँग्रेसची साथ २०१९ च्या निवडणुकीमध्ये १३ पैकी ८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला यावेळेस मात्र स्वकीय यांनीच पछाडले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, पटियालाचे खासदार तथा माजी मंत्री परीनीत कौर, तीन वेळा खासदार असलेले रवनितसिंह बिट्टू अशी दिग्गज मंडळी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये दाखल झाली आहे. याशिवाय आमदार राजकुमार चब्बेवाल, आमदार गुरुप्रीतसिंह जीपी यांनीही काँग्रेस सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसला पंजाबमध्ये सध्या स्वकीयांसोबतच लढाई करण्याचे माेठे आव्हान आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाPoliticsराजकारणFarmerशेतकरी