भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:04 IST2025-06-01T17:03:48+5:302025-06-01T17:04:16+5:30
भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते

भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जितके सुंदर आहे तितकेच त्याचा इतिहास रंजक आहे. ही अशी राजधानी होती, जिथे देशाला १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य मिळाले तरीही ६५९ दिवसांपर्यंत स्वतंत्र भारताचा हिस्सा नव्हते. भोपाळचं भारतात विलीनीकरण करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष चालला. त्यानंतर १ जून १९४९ साली भोपाळचे नवाबी शासनातून मुक्त होऊन भारतात सामील झाले. तब्बल २ वर्षांनी इथे तिरंगा फडकला होता.
भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ साली अधिकृतपणे स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशातील अनेक हिस्से असे होते, ज्यांना स्वतंत्र राहायचे होते अथवा पाकिस्तानात जायचे होते. भोपाळ संस्थानही त्यापैकी एक होते. इथं नवाब हमीदुल्लाह खा यांना पाकिस्तानात जायचे होते परंतु ते अशक्य होते त्यामुळे त्यांनी भोपाळला स्वतंत्र संस्थान ठेवण्याचं ठरवलं होते. मध्य प्रदेशातील सध्याची राजधानी भोपाळ देशाच्या स्वातंत्र्यानंतर १ जून १९४९ साली स्वतंत्र झाले. या दिवसाची आठवण म्हणून थे भोपाळ गौरव दिन साजरा केला जातो.
१ जूनला भोपाळमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर कशारितीने भोपाळमध्ये तिरंगा फडकला आणि त्यासाठी लोकांना ६५९ दिवस कसा संघर्ष केला याची आठवण काढली जाते. भोपाळचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी पहिली सभा इछावरच्या चौक मैदानात आयोजित केली होती. स्वातंत्र्याची लढाई सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी किसान न्यूज पेपर प्रकाशित होत होते. भोपाळच्या लोकांनी विलीनीकरणासाठी आंदोलन पुकारले होते. त्याच काळात नर्मदा नदीकिनारी काहींनी तिरंगा फडकवला तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ युवक शहीद झाले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी रागात बीपी मेनन यांना भोपाळला पाठवून १ जून १९४९ साली भोपाळचे भारतात विलीनीकरण करून घेतले.