शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीशांचा तो प्रश्न आणि निरीक्षण, ठाकरे गटाची अडचण? धाकधूक वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 5:06 PM

Supreme Court: सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये झालेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वकील, ठाकरे गटाच्या वकीलांनी जोरदार युक्तिवाद केले. दोन्हीकडच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सरन्यायाधीशांकडून त्याबाबत विचारण्यात येत असलेले प्रतिप्रश्न यामुळे या सुनावणीला नवनवी वळणं मिळालं आहेत. दरम्यान, सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.

आज सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांकडून पूर्वस्थिती पुन:स्थापित करून ठाकरे सरकार पुन्हा स्थापित करावे अशी विनंती कोर्टात करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीसांनी पुम्ही सरकार पुन:स्थापित करा असं म्हणत आहात, पण तुम्ही तर राजीनामा दिला आहे, असा सवाल केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्या राजीनाम्याला काही उत्तर नाही असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी इथे ज्या सरकारने राजीनामा दिलाय, त्या सरकारला पुनस्थापित करण्याची मागणी केली जात आहे अशी टिप्पणी केली. 

तर न्यायमूर्ती शाह यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना केला नाही त्याला कोर्ट पुनस्थापित कसं करू शकते असा प्रश्न केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी न्यायव्यवस्थेने कुणाला पुनस्थापित करायचे नाही आहे. तर पूर्वस्थिती बहाल करायची आहे, असं उत्तर  दिलं.  

त्यानंतर सिंघवी यांनी राज्यपालांनी उचललेल्या बेकायदेशीर पावलांबाबतची केस कोर्टात प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरन्यायाधीशांनी केवळ राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यास सांगितले म्हणून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला का असा प्रश्न विचारला.  तसेच विश्वासदर्शक ठराव विरोधात जाणार याची कल्पना आल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, हेही तुम्ही प्रांजळपणे मान्य करताय, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. त्यामुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीतील अखेरच्या टप्प्यात सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं हे निरीक्षण निर्णायक ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षावर काल झालेल्या सुनावणीवेळी राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या तुषार मेहता यांच्यावर सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. तसेच या सर्व घटनाक्रमातील राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे