शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

थरुर यांच्यावर खुनाचा खटला चालवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 6:52 AM

पोलिसांचा युक्तिवाद । २0१४ मध्ये झाला होता सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भात खुनाचा आरोप ठेवून खटला चालविला जावा, असा आग्रह दिल्ली पोलिसांतर्फे शनिवारी न्यायालयत धरण्यात आला. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी संशयास्पद स्थितीत मृत आढळल्या होत्या. त्यासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यात त्यांचे पती शशी थरुर हे एकमेव आरोपी आहेत.

या खटल्यासाठी आरोपनिश्चितीच्या संदर्भात गुरुवारी विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यापुढे पोलिसांतर्फे पब्लिक प्रॉसिक्युटर अतुल श्रीवास्तव यांचा युक्तिवाद झाला. तपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे श्रीवास्तव यांनी असे आग्रही प्रतिपादन केले की, थरुर यांच्याविरुद्ध भादवि कलम ४९८ ए (विवाहितेचा छळ करणे) व कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे ) या कलमान्वये किंवा पर्याय म्हणून कलम ३०२ (खून) या अन्वये आरोप निश्चित करून खटला चालविला जावा. श्रीवास्तव म्हणाल्या की, मृत्यूच्या आधीपर्यंत सुनंदा पुष्कर यांची प्रकृती ठणठणीत होती व त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष आहे. हे विष त्यांना केवळ तोंडावाटेच नव्हे तर इंजेक्शननेही दिले गेले असण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. मृतदेहावर दाताने चावल्याच्या व्रणाखेरीज अन्य जखमाही आढळल्या. यावरून मृत्यूपूर्वी त्यांची शारीरिक झटापट झाली असावी.शारीरिक, मानसिक छळ केल्याचा दावाथरुर दाम्पत्याच्या घरातील नोकर व पुष्कर यांच्या मित्रांच्या जबानीवरून असे स्पष्ट होते की, त्यांचे वैवैहिक संबंध कमालीचे बिघडलेले होते.एवढेच नव्हे तर ‘आता जगण्याचीही इच्छा राहिलेली नाही’, असे पुष्कर यांनी काहींना सांगितले होते. यावरून थरूर यांनी त्यांचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही छळ केल्याचे दिसते, असेही प्रॉसिक्युटरचे म्हणणे होते.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस