शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मणिपूरमध्ये तणाव; 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद, CBI संचालक स्पेशल फ्लाइटने पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 23:25 IST

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा रविवार (1 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.45 पर्यंत बंद राहील.  पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. 

याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.

...म्हणून पुन्हा सुरू झाला तणाव - मणिपूरमध्ये जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंफाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे फिजाम हेमजीत (20) आणि हिजाम लिनथोइनगांबी (17) असे आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह - राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, बेपत्ता विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात, मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.

बिरेन सिंह म्हणाले, "महत्त्वाच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह बुधवारी सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधता येईल. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारInternetइंटरनेटSchoolशाळाPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग