शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:17 IST

Telangana Lok Sabha Election 2024; हैदराबादमध्ये भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत  आल्या आहेत. हैदराबादमध्येभाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेलेल्या नवनीत राणा यांनी ओवेसी बंधूंना आव्हान देताना १५ सेकंदांसाठी पोलीस हटवले तर तर मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे ठरतील, असं विधान केलं होतं. या विधानावरून आता मोठ्या वादाला तोंड फुटलं असून, एमआयएमने राणांच्या विधानावरून थेट भाजपााला लक्ष्य  केलं आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. अशा विधानांमुळे निवडणुकीदरम्यान, दोन समुदायांमधील तणाव वाढू शकतो, असा दावा वारिस पठाण यांनी केला आहे.

या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना त्यांच्या हैदराबाद या पारंपरिक मतदारसंघामध्ये भाजपाच्या माधवी लता यांनी आव्हान दिले आहे. या माधवी लता यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा ह्या हैदराबादमध्ये गेल्या होत्या. तेथील प्रचारसभेदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवनीत राणा म्हणतात की, एक धाकटा  आणि एक मोठा भाऊ आहे. त्यात धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवलं तर आम्ही काय करू शकतो, हे दाखवून देऊ, या छोट्याला माझं एवढंच सांगणं आहे की, तुला १५ मिनिटं लागतील, पण आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेसे आहेत.  १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, ओवेसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गेले हे कळणारही नाही, असे सांगताना दिसत आहेत.

आता नवनीत राणा यांच्या या विधानावर वारिस पठाण यांनी पटलवार केला आहे. ते म्हणाले की, भाजपा नेते निवडणुकीदरम्यान अशी विधानं करत आहेत जी निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करणारी आहेत. अशी विधानं दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने नवनीत राणा यांच्यावर या विधानासाठी कठोर कारवाई केली पाहिजे.  जर वारिस पठाण याने नवनीत राणांसारखं विधान केलं असतं, तर त्याला आज तुरुंगात टाकलं असतं, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या विधानाबाबत वारिस पठाण म्हणाले की, तेव्हा अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांसाठी पोलीस हटवा, असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केलं होतं. तसेच जवळपास ४०-४२ दिवस तुरुंगात राहिले होते. नंतर त्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि दोषमुक्त झाले. आता निवडणूक आयोग नवनीत राणा यांच्यावर कधी कारवाई करणार आणि त्यांना तुरुंगात कधी पाठवणार, असा सवाल वारिस पठाण यांनी केला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनhyderabad-pcहैदराबादtelangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४