शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

शिक्षकांनी अध्यापनाचा दर्जा सुधारावा- सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:42 IST

शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील, असे सिंह म्हणाले

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दर्जेदार संशोधनात्मक कार्यासाठी पेटंट मिळावे यासाठी शिक्षकांनी अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. यादृष्टीने सरकारच्या वतीने अनेक स्तरांवर काम केले जात आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (उच्चशिक्षण) डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले. कुलगुरूंच्या परिषदेत ते बोलत होते. शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील. शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन केंद्र सुरू केले जात आहेत. एसआयसीटीईमार्फत तंत्रशास्त्र शिक्षण संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित परिषदेत सांगितले.एसआयसीटीईने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात बदल केला आहे. शिक्षकांनाही अध्यापनाची प्रगत पद्धत समजली पाहिजे. याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. या परिषदेत जारी करण्यात आलेल्या अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण अहवालात देशांतील ६०.४८ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. यापैकी ११.०४ टक्के महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. फक्त ३.६ टक्के महाविद्यालयात पीएच.डी. अभ्यासक्रम आहे. ३६.७ टक्के महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. ३३.७५ टक्के महाविद्यालयांत एकच अभ्यासक्रम आहे. यापैकी ८३ टक्के महाविद्यालये खाजगी आहेत.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगTeacherशिक्षकEducationशिक्षण