शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शिक्षकांनी अध्यापनाचा दर्जा सुधारावा- सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:42 IST

शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील, असे सिंह म्हणाले

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : दर्जेदार संशोधनात्मक कार्यासाठी पेटंट मिळावे यासाठी शिक्षकांनी अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्याची गरज आहे. यादृष्टीने सरकारच्या वतीने अनेक स्तरांवर काम केले जात आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (उच्चशिक्षण) डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले. कुलगुरूंच्या परिषदेत ते बोलत होते. शिक्षकांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकविले, तर विद्यार्थी त्यांचा आदर करतील. शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन केंद्र सुरू केले जात आहेत. एसआयसीटीईमार्फत तंत्रशास्त्र शिक्षण संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित परिषदेत सांगितले.एसआयसीटीईने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात बदल केला आहे. शिक्षकांनाही अध्यापनाची प्रगत पद्धत समजली पाहिजे. याची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. या परिषदेत जारी करण्यात आलेल्या अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण अहवालात देशांतील ६०.४८ टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. यापैकी ११.०४ टक्के महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. फक्त ३.६ टक्के महाविद्यालयात पीएच.डी. अभ्यासक्रम आहे. ३६.७ टक्के महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. ३३.७५ टक्के महाविद्यालयांत एकच अभ्यासक्रम आहे. यापैकी ८३ टक्के महाविद्यालये खाजगी आहेत.

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगTeacherशिक्षकEducationशिक्षण