शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:36 IST

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

भारताच्या दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूत भाषा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या त्रिभाषिक धोरणामुळे राज्य आणखी एका भाषिक युद्धाच्या दिशेने जातंय असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केला आहे. तामिळनाडूत नेहमी तामिळ आणि इंग्रजी चालेल. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, जर केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही पूर्ण तयार आहोत. तामिळनाडूत फक्त तामिळ आणि इंग्रजी वापरली जाईल. हिंदी लादण्याचा कुणी प्रयत्न करत असेल त्याचा आम्ही तीव्र विरोध करू. १९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

स्टॅलिन यांच्यावर भाजपाचा पलटवार

दुसरीकडे तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर पलटवार केला आहे. द्रमुकच्या भाषा धोरणात ढोंगीपणा आहे. आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाही असं मुख्यमंत्री सांगतात मात्र तामिळनाडूत सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकण्याची संधीही दिली जात नाही. खासगी शाळांमध्ये ही सुविधा आहे. मग जर तुम्हाला तिसरी भाषा शिकायची असेल तर द्रमुकच्या नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या सीबीएसई खासगी शाळांमध्येच मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे का असा सवाल अन्नामलाई यांनी केला आहे.

केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

दरम्यान,  केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी नुकताच दिला आहे. हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्‍यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

येत्या ५ मार्च रोजी तामिळनाडूत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केले आहे. या बैठकीत जनगणनाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणात आणण्यात तामिळनाडू राज्य यशस्वी झालं आहे. लोकसंख्या कमी झाल्याने लोकसभा मतदारसंघही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा आवाज कमी होईल. त्यामुळे लोकसंख्येवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूhindiहिंदीBJPभाजपा