शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:36 IST

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

भारताच्या दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूत भाषा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या त्रिभाषिक धोरणामुळे राज्य आणखी एका भाषिक युद्धाच्या दिशेने जातंय असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केला आहे. तामिळनाडूत नेहमी तामिळ आणि इंग्रजी चालेल. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, जर केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही पूर्ण तयार आहोत. तामिळनाडूत फक्त तामिळ आणि इंग्रजी वापरली जाईल. हिंदी लादण्याचा कुणी प्रयत्न करत असेल त्याचा आम्ही तीव्र विरोध करू. १९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

स्टॅलिन यांच्यावर भाजपाचा पलटवार

दुसरीकडे तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर पलटवार केला आहे. द्रमुकच्या भाषा धोरणात ढोंगीपणा आहे. आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाही असं मुख्यमंत्री सांगतात मात्र तामिळनाडूत सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकण्याची संधीही दिली जात नाही. खासगी शाळांमध्ये ही सुविधा आहे. मग जर तुम्हाला तिसरी भाषा शिकायची असेल तर द्रमुकच्या नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या सीबीएसई खासगी शाळांमध्येच मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे का असा सवाल अन्नामलाई यांनी केला आहे.

केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

दरम्यान,  केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी नुकताच दिला आहे. हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्‍यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

येत्या ५ मार्च रोजी तामिळनाडूत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केले आहे. या बैठकीत जनगणनाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणात आणण्यात तामिळनाडू राज्य यशस्वी झालं आहे. लोकसंख्या कमी झाल्याने लोकसभा मतदारसंघही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा आवाज कमी होईल. त्यामुळे लोकसंख्येवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूhindiहिंदीBJPभाजपा