शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

६० वर्षांनी तामिळनाडू पुन्हा पेटणार?; भाषिक युद्धासाठी आम्ही तयार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:36 IST

१९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

भारताच्या दक्षिणेकडील राज्य तामिळनाडूत भाषा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या त्रिभाषिक धोरणामुळे राज्य आणखी एका भाषिक युद्धाच्या दिशेने जातंय असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केला आहे. तामिळनाडूत नेहमी तामिळ आणि इंग्रजी चालेल. भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, जर केंद्र सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही पूर्ण तयार आहोत. तामिळनाडूत फक्त तामिळ आणि इंग्रजी वापरली जाईल. हिंदी लादण्याचा कुणी प्रयत्न करत असेल त्याचा आम्ही तीव्र विरोध करू. १९६५ साली हिंदीविरोधी आंदोलनाचा दाखला देत द्रविडनं यशस्वीरित्या १९६५ मध्ये हिंदी लादण्याविरोधात आंदोलन केल्याची आठवण मुख्यमंत्र्‍यांनी करून दिली.

स्टॅलिन यांच्यावर भाजपाचा पलटवार

दुसरीकडे तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर पलटवार केला आहे. द्रमुकच्या भाषा धोरणात ढोंगीपणा आहे. आम्ही कोणत्या भाषेला विरोध करत नाही असं मुख्यमंत्री सांगतात मात्र तामिळनाडूत सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकण्याची संधीही दिली जात नाही. खासगी शाळांमध्ये ही सुविधा आहे. मग जर तुम्हाला तिसरी भाषा शिकायची असेल तर द्रमुकच्या नेत्यांकडून चालवल्या जाणाऱ्या सीबीएसई खासगी शाळांमध्येच मुलांनी प्रवेश घेतला पाहिजे का असा सवाल अन्नामलाई यांनी केला आहे.

केंद्राने १० हजार कोटी दिले तरी...

दरम्यान,  केंद्र सरकारने १० हजार कोटी ऑफर केले तरीही राज्यात नवीन शिक्षण धोरण लागू होऊ देणार नाही असा इशारा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी नुकताच दिला आहे. हा विरोध केवळ हिंदी भाषा लादण्यावरूनच नाही तर या नव्या धोरणात अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामुळे विद्यार्थी आणि सामाजिक न्याय प्रणालीवर परिणाम होऊ शकतो असा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. 

मुख्यमंत्र्‍यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

येत्या ५ मार्च रोजी तामिळनाडूत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांनी केले आहे. या बैठकीत जनगणनाच्या मुद्द्यावर चर्चा होईल. कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणात आणण्यात तामिळनाडू राज्य यशस्वी झालं आहे. लोकसंख्या कमी झाल्याने लोकसभा मतदारसंघही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांवर राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा आवाज कमी होईल. त्यामुळे लोकसंख्येवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूhindiहिंदीBJPभाजपा