शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीमुळेच संघावर चढली लोकशाहीची झूल

By admin | Updated: October 21, 2015 04:26 IST

देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चूक केली. कारण आणीबाणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना लोकशाहीची झूल पांघरून भारताच्या

हैदराबाद : देशात आणीबाणी लागू करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चूक केली. कारण आणीबाणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना लोकशाहीची झूल पांघरून भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊ शकली. आणीबाणीचा हाच खरा विघातक परिणाम आहे, असे परखड मत ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले.वृत्तंसस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपले व्यक्तिगत मत मांडताना रमेश म्हणाले की, आणीबाणीमुळे देशातील संसदीय लोकशाहीचा गळा घोटल्याचे दूषण काँग्रेसवर आले व जे मुळात लोकशाहीवादी नाहीत अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यासारख्या लोकांना लोकशाहीची झूल पांघरून राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला.त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघास राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाही आणीबाणीचा घातक परिणाम ठरला. भारतीय जनता पार्टीसारख्या पराकोटीच्या असहिष्णू लोकांना लोकशाहीवादी म्हणून मिरविणेही आणीबाणीमुळेच शक्य झाले, असेही काँग्रेसचे राज्यसभा सदस्य असलेले रमेश म्हणाले.आणीबाणी लागू करण्यामागची पर्स्थििती काय होती हा इतिहास जरी बाजूला ठेवला तरी आणीबाणी लागू करणे चुकीचे होते असेच म्हणावे लागेल. कारण ज्या काँग्रेस पक्षाने देशात संसदीय लोकशाही रुजवली तोच पक्ष लोकशाहीचा मारक म्हणून बदनाम झाला व जी मंडळी मुळात कधीच लोकशाहीवादी नव्हती अशांना लोकशाहीवादी म्हणून वावरण्यास वाव मिळाला.त्यामुळे या दृष्टीने विचार करता आणीबाणी लागू करणे ही इंदिरा गांधीची चूक झाली, असे म्हटले तरी अखेर नेहरुवादी विचारसरणीच वरचढ ठरली, असे रमेश यांचे म्हणणे होते.ते म्हणाले की, ज्या इंदिराजींनी आणीबाणी लादली त्यांनीच आणीबाणीचा फैसलाही केला. इंदिराजींवरील नेहरुवादी विचारांचा पगडाच अखेर वरचढ ठरला. म्हणूनच त्यांनी १९७७ मध्ये स्वत:हून आणीबाणी उठवून निवडखुका जाहीर केल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी जनतेचा कौलही शिरसावंद्य मानला.ज्या मतदारांनी १९७७ मध्ये उंदिरा गांधींना नाकारले त्यांनीच १९८० मध्ये त्यांना पुन्हा सत्तेवर आणले. हेच तर लोकशाहीचे खरे बळ आहे, असेही रमेश म्हणाले. (वृत्तसंस्था)