शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांनी मला ट्वीटरवर ब्लॉक केलं; प्रतापसिंह बाजवा यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 14:22 IST

राज्यसभेतील कॉंग्रेसचे खासदार असणाऱ्या प्रतापसिंह बाजवा यांना आपल्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले.

ठळक मुद्दे बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे.इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला ट्वीटरवर ब्लॉक केल्याचा आरोप राज्यसभेतील कॉंग्रेसचे खासदार यांनी केला आहे. इराकमध्ये बेपत्ता झालेल्या 39 भारतीयांबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी मला ब्लॉक केले असे बाजवा म्हणाले आहेत.

"अशाप्रकारे तुम्ही परराष्ट्र मंत्रालय चालवणार आहात का ? संसद सदस्याने 39 बेपत्ता भारतीयांबद्दल विचारलेल्या प्रश्नांबाबत तुम्ही अशा प्रकारे व्यक्त झालात तर परराष्ट्र मंत्रालय कार्यालयाचा सन्मान राहिल का ?" अशा शब्दांमध्ये संताप व्यक्त करत बाजवा यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांना विचारलेल्या प्रश्नाच्या ट्वीटचे स्क्रीन शॉटसही दिले आहेत. "पंजाब आणि देशाच्या इतर भागातील लोक परदेशात विविध समस्यांना तोंड देत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संबंधित देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करावी असे मी खासदार या नात्याने ट्वीट केले होते मात्र जर त्या खासदारालाच ब्लॉक करत असतील तर मग बाकीच्यांचे काय होईल ?" असा प्रश्न बाजवा यांनी विचारला आहे.गुरुदासपूरचे माजी खासदार आणि कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या बाजवा यांना आपल्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ब्लॉक केल्याचे लक्षात आले. पाकिस्तानातील खैबर-पख्तुनवा प्रांतात शिख समुदायातील लोकांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याबद्दल ट्वीट करुन बाजवा यांनी सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यामध्ये टॅग केले. बेपत्ता झालेल्या भारतीयांबाबत सुषमा स्वराज यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संसदेची दिशाभूल केली असा आरोप बाजवा यांनी केला आहे. इराकमधील मोसूलजवळ 39 भारतीय बेपत्ता झाले असून त्यात पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, होशियारपूर, कपूरथळा, जालंधर शहरांमधील लोकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजIndiaभारतParliamentसंसदcongressकाँग्रेस