शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

CAA : 'जामिया' हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; हायकोर्टात जाण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 16:34 IST

Jamia Protest : या प्रकरणात समिती बनवू शकत नाही जी संपूर्ण देशातील प्रकरणाकडे लक्ष देईल.

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राजधानी दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचाराबाबत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले आहेत. विविध ठिकाणी संबंधित घटना घडल्या असून त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात शक्य नाही असं सांगत जामिया हिंसाचार प्रकरणात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार दिला आहे. 

याबाबत सुप्रीम कोर्टाने संबंधित याचिकाकर्त्यांना हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश दिलेत.  हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूत लक्ष घालतील. कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हायकोर्टाला आहे. त्याचसोबत या घटनेची न्यायिक चौकशी  करण्यालाही कोर्टाने नकार दिला आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस कशा जळाल्या? हे प्रकरण हायकोर्टात का नेलं नाही? असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला. 

जामिया आणि एएमयू विद्यार्थ्यांकडून वकील इंदिरा जय सिंह यांनी ही घटना एकापेक्षा अधिक राज्यांशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. कोर्ट या घटनेकडे दुर्लक्ष करु शकत नाही. ज्याप्रकारे तेलंगणा एन्काऊंटरमध्ये कोर्टाने सुनावणी केली तसे या प्रकरणात निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. 

यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले की, तेलंगणा प्रकरणात एक आयोग गठित करुन घटनेची चौकशी करु शकतो. पण या प्रकरणात समिती बनवू शकत नाही जी संपूर्ण देशातील प्रकरणाकडे लक्ष देईल. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यापासून सुप्रीम कोर्ट रोखू शकत नाही. जर कोणी कायदा मोडत असेल तर पोलीस काय करणार? त्यामुळे तुम्ही या प्रकरणात हायकोर्टात जाऊ शकतात असं त्यांनी सांगितले. 

कोर्टात पोलिसांच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील तुषार मेहतांनी सांगितले की, 68 जखमी लोकांना रुग्णालयात पाठविले आहे. यावेळी कोर्टाने पोलिसांनी विचारले की, विनाचौकशी अटक का केली? यावर मेहतांनी कोणत्याही विद्यार्थ्याला अटक केली नाही, अन् जेलमध्ये पाठविले नाही असा दावा पोलिसांच्या वकीलांकडून करण्यात आला.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयagitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकStudentविद्यार्थीPoliceपोलिस