शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रोस्टरचे सर्व अधिकार सरन्यायाधीशांकडेच, सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 12:24 IST

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने याचा पुनरुच्चार केला.

नवी दिल्ली- सरन्यायाधीश हे समानातील पहिले म्हणजेच फर्स्ट अमंग द इक्वल्स आहेत, त्यांच्याकडेच न्यायाधीशांच्या रोस्टरचे अधिकार आहेत असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आज स्पष्ट केले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री शांती भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने याचा पुनरुच्चार केला.

न्यायाधीशांमध्ये न्यायालयासमोर आलेल्या प्रकरणांचे वाटप करण्याचा अधिकार हा समानातील पहिला या न्यायाने सरन्यायाधीशांकडे आहे असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रॅक्टीस अँड प्रोसीजर अँड ऑफिस प्रोसिजर 2017 नुसार खटल्याचे वाटप, वर्गीकरण (रोस्टर) हे सरन्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार करत असतात. वेळोवेळी अचानक येणाऱ्या प्रकरणांच्या आवश्यकतेनुसार सरन्यायाधीश त्या त्या वेळेस रजिस्ट्रारना आदेश देऊन कामांचे पुनर्वाटप किंवा त्यात बदल करु शकतात.यावर्षी आणखी एका जनहित याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका स्पष्ट केली होती. सर्वोच्च न्यायलयात कोणीही ज्येष्ठ व कनिष्ठ न्यायाधीश असा प्रकार नाही. सर्व न्यायाधीश समान पातळीवर आहेत. खंडपिठ ठरवण्याचा, त्याचे सदस्य नेमण्याचा व खटल्यांचे वाटप करण्याचा पूर्ण अधिकार केवळ एकट्या सरन्यायाधीशांकडे आहे असे न्यायालयाने तेव्हा सांगितले होते. आज सुनावणीमध्ये न्यायाधीश सिक्री म्हणाले, '' राज्यघटनेत रोस्टरचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतील असे स्पष्ट करण्यात आले नसले तरी न्यायालयातील शिस्त व योग्य पद्धतीचा विचार करता ते त्यांच्याकडेच असणे आवश्यक आहे. तसेच खटल्यांचे वाटप करताना इतर न्यायाधीशांशी चर्चा-मसलत करण्याची गरज नाही.''

12 जानेवारी रोजी चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतल्यामुळे देशभरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या चार न्यायाधीशांनी न्यायमूर्ती बी.एच लोया यांच्या मृत्यूचे प्रकरण 'कनिष्ठ' न्यायाधीशांकडे देण्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारतjustice loyaन्यायाधीश लोया