शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Lok Sabha Election 2019 : रिल लाईफमधील सुपरस्टार; राजकारणात 'फ्लॉप'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 6:46 PM

अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षातील नाराज नेत्यांचे पक्षांतरही जोरदार सुरू असताना अनेक ठिकाणी सिने कलाकारांना अनेक पक्ष उमेदवारी देत आहेत. महाराष्ट्रात देखील उर्मिला मांतोडकर या अभिनेत्रीला उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, निवडणुकीत निवडून येणारे कलाकार राजकारणात रमतात की, आपल्या क्षेत्रात परतात हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे. यामध्ये असलेले कालाकार :

अमिताभ बच्चन 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी हेमवती नंदन बहुगुना यांच्याविरुद्ध १ लाख ८७ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु, त्यांनी अर्ध्यातच राजकारण सोडून पुन्हा चित्रपट सृष्टीचा मार्ग धरला होता.

सुनील दत्त 

सुनील दत्त यांनी काँग्रेसकडून १९८४ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून राम जेठमलानी यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात सक्रिय राहिले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील उपभोगले होते.

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्यासारखा स्टारडम त्यावेळी हिंदी सिनेमात कोणत्याच स्टारला नव्हतं. काँग्रेसच्या तिकीटावर राजेश खन्ना १९९२ आणि १९९६ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. परंतु त्यांची राजकीय इनिंग अधिककाळ चालली नाही. त्यांनी लवकरच राजकारणाला अलविदा केले होते.

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. परंतु, राजकारणात त्यांची जादू चालली नाही. २००४ मध्ये बिकानेरमधून धर्मेंद्र निवडून आले होते. मात्र संसदेतील गैरहजरीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण सोडले होते.

गोविंदा

गोविंदाने आपल्या चित्रपटातून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याने २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु त्याची राजकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली. अखेर गोविंदाने २००८ मध्ये राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीचा मार्ग धरला.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तला २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळाले होते. परंतु, न्यायालयाने संजय दत्तवर निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर संजय दत्तने २०१० मध्ये समावादी पक्ष सोडला होता. अखेरीस राजकारणात त्याची कारकिर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती.

परेश रावल

अभिनेते परेश रावल यांनी २००९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. परंतु, परेश रावल यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. कार्यकर्ता म्हणून आपण भाजपचे काम करू, असंही त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले.

या व्यतिरिक्त राजकारणात अनेक अभिनेते-अभिनेत्री यशस्वी झाले आहेत. यामध्ये स्मृती इराणी, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, किरण खैर, हेमा मालिनी यांनी राजकारणात आपले एक स्थान निर्माण केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAmitabh Bachchanअमिताभ बच्चन