शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शेतकऱ्यांसाठी ऊस आणखी झाला गोड! एफआरपीत प्रतिटन 150 रुपयांनी वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:26 IST

केंद्र सरकारचा निर्णय: उताऱ्याचा बेसरेट आता १० ऐवजी १०.२५ टक्के; ५ कोटी ऊस उत्पादकांना हाेणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली/कोल्हापूर  २०२२-२३ या साखर हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) उसाला प्रतिटन ३०५० रुपये एफआरपी केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या निर्णयानुसार, प्रतिटन ३०५० रुपये हा भाव १०.२५ टक्के साखर उताऱ्यास आहे. त्यापेक्षा जास्त अथवा कमी उतारा आल्यास भाव कमी किंवा जास्त होईल. प्रत्येक ०.१ टक्का वाढीव उताऱ्यामागे प्रतिटन ३०५० रुपये वाढीव, तर प्रत्येक ०.१ टक्का कमी उताऱ्यामागे प्रतिक्विंटल ३०५० रुपये कमी भाव मिळेल. मात्र उतारा ९.५ टक्क्यांच्याही खाली घसरल्यास भावात आणखी कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना प्रतिटन २८२१ रुपये प् या दराने कारखान्यांकडून पैसे दिले जातील. २०२१-२२ मध्ये हा दर २७५५ रुपये होता.

आठ वर्षांत ३४ टक्के वाढn शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारने मागील ८ वर्षांत उसाच्या एफआरपीमध्ये ३४ टक्क्यांची वाढ केली आहे.n याचवेळी उताऱ्याचा बेस रेटही ९ टक्कयांवरुन १०.२५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. २०१३-१४ मध्ये प्रतिटन २११० रुपये एफआरपी होती. तर उसाचे उत्पादन २३९७ लाख टन होते. ऊस उत्पादकांना ५१ हजार कोटी मिळत होते. n २०२१-२२ च्या हंगामात एफआरपी २९०० रुपये होता. उसाचे उत्पादन ३५३० लाख टन होते. यातून ऊस उत्पादकांना १ लाख १५ हजार १९६ कोटी रुपये मिळाले आहेत.

महाराष्ट्रात ६० लाख ऊस उत्पादकउसाच्या भावात वाढ करण्याच्या निर्णयाचा देशातील ५ कोटी उस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल. साखर कारखाने आणि इतर पूरक उद्योगांतून ५ लाख कामगारांना रोजगार मिळतो. महाराष्ट्रात ५५ ते ६० लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या हंगामात महाराष्ट्रातील १९९ साखर कारखाने सुरू होते. येत्या हंगामात २०० हून अधिक कारखाने सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

विक्री दरात वाढ नाहीचn साखरेचे भाव कोसळण्यास आळा बसावा यासाठी सरकारने साखरेसाठी ‘किमान विक्री दर (एमएसपी) संकल्पना आणली आहे. n २०१८ मध्ये एमएसपी २९ रुपये किलो इतकी ठरविण्यात आली होती. १४ फेब्रुवारी २०१९ पासून ती ३१ रुपये किलो इतकी आहे. n साखर निर्यातीस प्रोत्साहन, शिलकी साठा व्यवस्थापन, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढ व शेतकऱ्यांची बाकी देणे यांसाठी साखर कारखान्यांना १८ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. हा दर वाढवून ३५०० रुपये करावा या कारखानदारांच्या मागणीकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.

उत्पादन खर्च कमीचसन २०२२-२३ या साखर वर्षासाठी ऊस उत्पादनाचा खर्च १६२० रुपये प्रतिटन निर्धारित करण्यात आला आहे. त्या तुलनेत उसाला जाहीर झालेला भाव ८८.३ टक्के अधिक आहे. तसेच २०२१-२२ च्या तुलनेत हा भाव २.६ टक्क्यांनी अधिक आहे. असे असले तरी मशागत खर्च , खातांच्या वाढलेल्या किमंती याचा विचार करता ऊसाचा उत्पादन खर्च यापेक्षा कितीतरी जादा आहे.

प्रत्यक्षात वाढ कमीचप्रतिटन १५० रुपये वाढ दिसत असली तरी साखर उताऱ्याचा बेस १० टक्कयांवरुन १०.२५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे मूळ १० टक्के उताऱ्याच्या आधार गृहीत धरला तर शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात ११२ रुपये ५० पैसेच प्रतीटन वाढीव मिळणार आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने