शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शेतकऱ्यांसाठी ऊस आणखी झाला गोड! एफआरपीत प्रतिटन 150 रुपयांनी वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 06:26 IST

केंद्र सरकारचा निर्णय: उताऱ्याचा बेसरेट आता १० ऐवजी १०.२५ टक्के; ५ कोटी ऊस उत्पादकांना हाेणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली/कोल्हापूर  २०२२-२३ या साखर हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) उसाला प्रतिटन ३०५० रुपये एफआरपी केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या निर्णयानुसार, प्रतिटन ३०५० रुपये हा भाव १०.२५ टक्के साखर उताऱ्यास आहे. त्यापेक्षा जास्त अथवा कमी उतारा आल्यास भाव कमी किंवा जास्त होईल. प्रत्येक ०.१ टक्का वाढीव उताऱ्यामागे प्रतिटन ३०५० रुपये वाढीव, तर प्रत्येक ०.१ टक्का कमी उताऱ्यामागे प्रतिक्विंटल ३०५० रुपये कमी भाव मिळेल. मात्र उतारा ९.५ टक्क्यांच्याही खाली घसरल्यास भावात आणखी कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना प्रतिटन २८२१ रुपये प् या दराने कारखान्यांकडून पैसे दिले जातील. २०२१-२२ मध्ये हा दर २७५५ रुपये होता.

आठ वर्षांत ३४ टक्के वाढn शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारने मागील ८ वर्षांत उसाच्या एफआरपीमध्ये ३४ टक्क्यांची वाढ केली आहे.n याचवेळी उताऱ्याचा बेस रेटही ९ टक्कयांवरुन १०.२५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. २०१३-१४ मध्ये प्रतिटन २११० रुपये एफआरपी होती. तर उसाचे उत्पादन २३९७ लाख टन होते. ऊस उत्पादकांना ५१ हजार कोटी मिळत होते. n २०२१-२२ च्या हंगामात एफआरपी २९०० रुपये होता. उसाचे उत्पादन ३५३० लाख टन होते. यातून ऊस उत्पादकांना १ लाख १५ हजार १९६ कोटी रुपये मिळाले आहेत.

महाराष्ट्रात ६० लाख ऊस उत्पादकउसाच्या भावात वाढ करण्याच्या निर्णयाचा देशातील ५ कोटी उस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल. साखर कारखाने आणि इतर पूरक उद्योगांतून ५ लाख कामगारांना रोजगार मिळतो. महाराष्ट्रात ५५ ते ६० लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या हंगामात महाराष्ट्रातील १९९ साखर कारखाने सुरू होते. येत्या हंगामात २०० हून अधिक कारखाने सुरू होतील अशी अपेक्षा आहे.

विक्री दरात वाढ नाहीचn साखरेचे भाव कोसळण्यास आळा बसावा यासाठी सरकारने साखरेसाठी ‘किमान विक्री दर (एमएसपी) संकल्पना आणली आहे. n २०१८ मध्ये एमएसपी २९ रुपये किलो इतकी ठरविण्यात आली होती. १४ फेब्रुवारी २०१९ पासून ती ३१ रुपये किलो इतकी आहे. n साखर निर्यातीस प्रोत्साहन, शिलकी साठा व्यवस्थापन, इथेनॉल उत्पादन क्षमता वाढ व शेतकऱ्यांची बाकी देणे यांसाठी साखर कारखान्यांना १८ हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. हा दर वाढवून ३५०० रुपये करावा या कारखानदारांच्या मागणीकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.

उत्पादन खर्च कमीचसन २०२२-२३ या साखर वर्षासाठी ऊस उत्पादनाचा खर्च १६२० रुपये प्रतिटन निर्धारित करण्यात आला आहे. त्या तुलनेत उसाला जाहीर झालेला भाव ८८.३ टक्के अधिक आहे. तसेच २०२१-२२ च्या तुलनेत हा भाव २.६ टक्क्यांनी अधिक आहे. असे असले तरी मशागत खर्च , खातांच्या वाढलेल्या किमंती याचा विचार करता ऊसाचा उत्पादन खर्च यापेक्षा कितीतरी जादा आहे.

प्रत्यक्षात वाढ कमीचप्रतिटन १५० रुपये वाढ दिसत असली तरी साखर उताऱ्याचा बेस १० टक्कयांवरुन १०.२५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे मूळ १० टक्के उताऱ्याच्या आधार गृहीत धरला तर शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्षात ११२ रुपये ५० पैसेच प्रतीटन वाढीव मिळणार आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने