शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
7
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
8
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
9
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
10
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
11
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
12
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
13
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
14
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
15
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
16
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
17
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
18
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
19
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
20
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील साखर हंगाम १४२ लाख टन शिलकी साखरेने होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 11:00 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसक्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे.

ठळक मुद्देइस्मा : राज्यातील साखर उत्पादन ५० लाख टनांच्या घरातआगामी गाळप हंगामामधे देशात २८२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा होता अंदाजराज्यात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील उसाचे ३० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज

पुणे : गेल्यावर्षी पावसाने दिलेली ओढ आणि यंदा पुराचा फटका बसल्याने राज्यातील ऊस गाळप हंगाम अडचणीत आहे. देशात आगामी ऊस गाळप हंगाम सुरू होताना तब्बल १४२ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे, तर २०१९-२० हंगाम संपल्यानंतर १६२ लाख टन साखर शिलकी राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊसक्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरून ८.२३ लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरू होत्या. त्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यामुळे यंदा ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असे पूरस्थिती उद्भवण्यापूर्वी साखर आयुक्तालयाने सांगितले होते. कोल्हापूर आणि सांगली या ऊस पट्ट्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेचे उत्पादनही ५० लाख टनांच्या आसपास राहील, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, की आगामी गाळप हंगामामधे देशात २८२ लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज होता. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील पूरस्थितीमुळे साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. देशातील साखर उत्पादन अडीचशे लाख टनापर्यंत घट होईल. राज्यात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील उसाचे ३० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानाचा अंदाज येण्यासाठी आणखी आठवडा लागू शकतो. आताच्या स्थितीवरून साखरेचे उत्पादन ५० लाख टनापर्यंत घसरेल, असे वाटते. .........

..म्हणून साखरेचे भाव टिकून राहण्यास मिळेल मदत

1 - राज्यात पूरस्थितीपूर्वी ६३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. कोल्हापूर आणि सांगलीला पुरामुळे ३० टक्के ऊसक्षेत्र बाधित असल्याचा प्राथिमक अंदाज आहे.

2- खात्रीशीर आकडा हाती येण्यास आणखी पाच ते सात दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे साखरेचे उत्पादन ५० लाख टनांपर्यंत घसरेल.

3 - सध्या राज्यात ६५ लाख टन साखर शिलकी आहे, तर राज्याचा वार्षिक खप ७० लाख टन आहे. त्यामुळे पुढील हंगामअखेरीस ४५ लाख टनांच्या आसपास साखर शिल्लक राहील.

...................

गेल्या २०१८-१९ च्या ऊस गाळप हंगामामधे देशात ३२० आणि राज्यात १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा अडीचशे लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे, तर १४२ लाख टन साखर शिलकी आहे. म्हणजेच पुढील हंगामात देशात ३९२ लाख टन साखर हाती असेल. देशांतर्गत वार्षिक खप २५५ लाख टन आहे. केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली असून, ४० लाख टनांचा बफर स्टॉक केला आहे. त्यामुळे साखरेचे भाव टिकून राहण्यास मदत मिळेल. 

.......... 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार