शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'राज्यातील सत्तासंघर्ष म्हणजे थरारक सिनेमा; मी स्वप्नातही बडबडायचो मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 09:52 IST

गेल्या ३६ दिवसाचा खेळ कमिटमेंटचा खेळ होता. आमदारांना सांभाळण्याची जबाबादारी सगळ्यांनी पार पाडली.

नवी दिल्ली - गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. सध्या दिल्लीत संसदेच्या अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत आहेत. यावेळी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी खासदारांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षावर मनसोक्त भाष्य केलं. 

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सत्तासंघर्ष रोमांचक होता, थ्रीलर सिनेमासारखा होता, आता काय होईल, दुपारी काय होईल, संध्याकाळी काय होईल हेच सुरु होतं. पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का? शेवटपर्यंत ही गोष्ट आपण सगळ्यांनी पुढे नेली. हा सिनेमा रोमांचक, भयपट म्हणा, थरारक असा होता असं त्यांनी सांगितले. 

तसेच अजित पवारांनी शपथ घेतली, सकाळी सकाळी अंघोळ करुन बसलो तेवढ्यात एकाने सांगितले अजित पवारांनी शपथ घेतली, मी म्हटलं की, मागची क्लीप असेल, हा फाजिल आत्मविश्वास होता. शरद पवारांवर आमचा विश्वास होता. शरद पवारांनी मनात आणलं आपल्याला हे करायचं आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. पवारांचा शब्दा होता फडणवीसांना घरी बसवायचा, साताऱ्यात पावसातही कमिटमेंट केली होती अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवारांचे कौतुक केले. 

दरम्यान, गेल्या ३६ दिवसाचा खेळ कमिटमेंटचा खेळ होता. आमदारांना सांभाळण्याची जबाबादारी सगळ्यांनी पार पाडली.  माझ्यावरही दबाव होता आपल्यामुळे नुकसान होत नाही का? शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखविला. महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्याने देशाला दिशा दिली. महाराष्ट्राने भीती मारली. संपविली त्याचे श्रेय महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्यांना जातं असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षाचे खासदार या मैफिलीला उपस्थित होते. त्यावेळी सत्तासंघर्षाचा ताणतणाव विसरुन यांनी भोजनाचा आस्वाद लुटला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Shewaleराहुल शेवाळे