शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

राहुल गांधींचं लग्न ठरलं?, आमदार अदिती सिंहनं अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 8:33 AM

राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. 

लखनौ - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दोघांना ''तुम्ही लग्न कधी करणार?'', या प्रश्नाला वारंवार सामोरं जावं लागतं. अशातच, राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राहुल गांधी आणि अदिती सिंह यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोच्या आधारे या दोघांचं लग्न होणार असल्याचा दावा काही जण सोशल मीडियावर करत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी, अदिती सिंह आणि त्याच्या परिवारातील काही सदस्य दिसत आहेत. 'राहुल गांधींना अखेर जोडीदार मिळाला. सोनिया गांधी पुढील बोलणी करत आहेत' असे कॅप्शन फोटोला देण्यात आले आहे.

मात्र दुसरीकडे, राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंह यांनी खंडन केलं आहे.  याबाबत अदिती सिंह म्हणाल्या आहेत की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे मी प्रचंड हैराण झाले आहे. राहुल गांधी केवळ आमच्या पार्टीचे अध्यक्ष नाहीत, तर माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. मी त्यांचा खूप आदर करते. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामुळे लग्नासंबंधीच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे सांगत अदिती सिंह यांनी अफवेबाबत खुलासा केला आहे. 

'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंह यांनी विरोधकांकडे बोट दाखवलं आहे.

(जेव्हा भर कार्यक्रमात बॉक्सर विजेंदर सिंगनं राहुल गांधींना विचारलं- कधी करणार लग्न?)

वयाच्या 47 वर्षीही राहुल गांधी बॅचलर असल्यानं अनेकदा त्यांना लग्नासंबंधी प्रश्नांचा सामना करावा लागतो. यापूर्वी बॉक्सर विजेंदर सिगनं एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना सर्वांसमोरच लग्नासंबंधीचा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. विजेंदर सिंग लग्नासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे, जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा लग्न होईल'.  नवी दिल्लीत पार पडलेल्या पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमादरम्यान विजेंदरनं राहुल गांधींना हा प्रश्न विचारला. यापूर्वीदेखील एका कार्यक्रमात जेव्हा राहुल गांधी यांना लग्नासंबंधी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले होते की, 'जेव्हा योग्य मुलगी मिळेल तेव्हा लग्न करणार'.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल