शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:28 IST

Sourav Ganguly on Ind-Pak : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Sourav Ganguly on Ind-Pak : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या एका विधानामुळे अडचणीत आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, गांगुलीने आशिया कप २०२५ मधील भारत-पाक सामन्यावर आपले मत व्यक्त केले. मात्र, यामुळेच सोशल मीडियावर गांगुलीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 

सौरव गांगुली अडचणीतएएनआयशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'मला यात काही अडचण नाही. खेळ सुरूच राहिला पाहिजे. पहलगाममध्ये जे घडले, ते घडू नये, पण खेळ सुरूच राहिला पाहिजे. दहशतवाद घडू नये, तो थांबवावा. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे.' या विधानामुळे गांगुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

पहलगाममध्ये काय घडले?२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले. त्यानंतर ७ मे रोजी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले आणि शंभरहून अधिक दहशतवादी मारले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यासारखे मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकविरोधात WCL मध्ये खेळण्यासही नकार वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरोधात खेळण्यास नकार दिला, त्यानंतर हा सामना रद्द करावा लागला. भारतीय खेळाडूंनी सांगितले की त्यांना पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध सामना खेळायचा नाही.

आशिया कप वेळापत्रक जाहीरआशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत असून, अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरSaurav Gangulyसौरभ गांगुलीPakistanपाकिस्तानIndiaभारत