शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भाजपाच्या नकारात्मक राजकारणावर काँग्रेसचा विजय, सोनिया गांधींनी व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:17 IST

भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचा तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवावर सोनिया गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी दिली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर झाले.

यावेळी छत्तीसगड, राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. विजयासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली.  मध्य प्रदेशात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे. पाचपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही तीन राज्य भाजपाकडे होती.

दरम्यान, प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे सोनिया गांधींनी निवडणुकांचा प्रचारांमध्ये सहभाग घेतला नाही. मंगळवारी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी काँग्रेसला 67 जागा मिळाल्या, मध्य प्रदेशात 230 जागांपैकी 114 जागा आणि राजस्थानमध्ये 199 जागांपैकी 99 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला. छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र, मध्य प्रदेशात केवळ दोन जागांमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर होती. दरम्यान, आता सपा-बसपा आणि अपक्षांनी कमलनाथ यांना पाठिंबा दर्शवण्याचे जाहीर केले आहे. राजस्थानमध्येही बसपा-सपानं काँग्रेस समर्थन दर्शवले आहे. 

(मोदींनी लोकांच्या मनातले न ऐकल्यानेच भाजपाचा पराभव- राहुल गांधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांत अनेक चांगली कामे करून दाखविण्याची संधी असताना त्यांनी ती घालवली. लोकांच्या मनात काय चालले आहे, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय सरकार, मंत्री व पक्ष अतिशय अहंकाराने वागू लागले. त्यामुळेच विधानसभा निवडणुकांत भाजपाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी म्हणाले.विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ते म्हणाले की, देशापुढे रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार निर्मूलन हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते मोदी यांनी मांडले होते, पण त्या प्रश्नावर प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यामुळे हेच मुद्दे घेऊन आम्ही पुढील काळात काम करणार आहोत. मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेला फक्त स्वप्ने दाखविली. ती पूर्ण न केल्याने जनतेने भाजपाला पराभूत केले.

मला २०१४च्या लोकसभा निवडणुकांतून खूप शिकायला मिळाले. येत्या लोकसभा निवडणुकांत विरोधी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात मजबूत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सपा, बसपा व काँग्रेसची विचारसरणी समानच आहे. अन्य विरोधकांनीही या आघाडीत सामील व्हावे, असा प्रयत्न आहे. तो यशस्वी झाल्यास भाजपाचा पराभव आम्ही नक्की करू शकतो. काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे आमच्यावर आता मोठी जबाबदारी आली आहे. त्या दृष्टीने आम्ही देशापुढे एक नवा कार्यक्रम ठेवणार आहोत, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालSonia Gandhiसोनिया गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा