शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:36 IST

Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन. 

ठळक मुद्देसोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक.पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं. "देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधकांना आपल्या समस्या दूर करून एकत्र येत सरकार स्थापन करण्याची गरज आहे," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची गरज आहे आणि काँग्रेस आपल्या बाजूनं कोणतीही कसर सोडणार नसल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे," असं आवाहन केलं. 

सोनिया गांधी यांनी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य केलं. "मला खात्री आहे की विरोधकांची ही एकजूट संसदेच्या पुढील सत्रांमध्येही कायम राहील. परंतु व्यापक राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल. अर्थातच आपलं लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणुका आहेत. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या उद्देशाने आपल्याला पद्धतशीरपणे नियोजन सुरू करावे लागेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.  दुसरा पर्याय नाहीसोनिया गांधी यांनी यावेळी विरोधकांना आवाहनही केलं. "'हे एक आव्हान आहे, पण एकत्र आपण त्यावर मात करू शकतो, कारण एकत्र काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या सर्वांच्या काही समस्या आहेत. पण आता राष्ट्रीय हितासाठी यापासून बाहेर येण्याची वेळ आली आहे," असंही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, बैठकीनंतर शरद पवार यांनीदेखील ट्वीट करत बैठकी संदर्भातील माहिती दिली. "सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं विरोधी पक्षांची बैठक पार पडली. व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले," असं ते म्हणाले.  विद्यमान सरकार मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी"विद्यमान सरकार या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलं आहे. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास करतात, ज्या लोकांना लोकशाहीच्या मूल्यांचा बचाव करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे, त्यांनी एकत्र यावं असं माझं आव्हान आहे. एक सूचीबद्ध कार्यक्रम सामूहिकरित्या सुरू करण्याची गरज आहे. सर्व मुद्द्यांवर एकत्र तोडगा काढण्याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं हे ठरवलं पाहिजे. आपल्या देशाला एक चांगला वर्तमान आणि भविष्य देण्यासाठी काम केल पाहिजे," असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, या बैठकीत समाजवादी पक्षाकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndiaभारत