शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

... परंतु एकत्र येऊन काम करण्याशिवाय सर्वांसमोर कोणताच पर्याय नाही; सोनिया गांधी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:36 IST

Congress President Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन. 

ठळक मुद्देसोनिया गांधी यांची विरोधी १९ पक्षांच्या नेत्यांसोबत पार पडली बैठक.पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचं केलं आवाहन. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं. "देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधकांना आपल्या समस्या दूर करून एकत्र येत सरकार स्थापन करण्याची गरज आहे," असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या. यावेळी विरोधी पक्षांची एकजूट ही राष्ट्रीय हिताची गरज आहे आणि काँग्रेस आपल्या बाजूनं कोणतीही कसर सोडणार नसल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशाच्या लोकशाहीच्या तत्त्वांना वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे," असं आवाहन केलं. 

सोनिया गांधी यांनी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह व्हर्च्युअल पद्धतीनं संवाद साधला. तसंच यावेळी त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) विरोधकांच्या एकजुटीवरही भाष्य केलं. "मला खात्री आहे की विरोधकांची ही एकजूट संसदेच्या पुढील सत्रांमध्येही कायम राहील. परंतु व्यापक राजकीय लढाई संसदेबाहेर लढावी लागेल. अर्थातच आपलं लक्ष्य २०२४ च्या लोकसभा निवडणुका आहेत. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या उद्देशाने आपल्याला पद्धतशीरपणे नियोजन सुरू करावे लागेल," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.  दुसरा पर्याय नाहीसोनिया गांधी यांनी यावेळी विरोधकांना आवाहनही केलं. "'हे एक आव्हान आहे, पण एकत्र आपण त्यावर मात करू शकतो, कारण एकत्र काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या सर्वांच्या काही समस्या आहेत. पण आता राष्ट्रीय हितासाठी यापासून बाहेर येण्याची वेळ आली आहे," असंही त्या म्हणाल्या. 

दरम्यान, बैठकीनंतर शरद पवार यांनीदेखील ट्वीट करत बैठकी संदर्भातील माहिती दिली. "सोनिया गांधी यांच्या पुढाकारानं विरोधी पक्षांची बैठक पार पडली. व्हर्च्युअल पद्धतीनं पार पडलेल्या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार व्यक्त केले," असं ते म्हणाले.  विद्यमान सरकार मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी"विद्यमान सरकार या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरलं आहे. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास करतात, ज्या लोकांना लोकशाहीच्या मूल्यांचा बचाव करण्यासाठी एकत्र काम करायचं आहे, त्यांनी एकत्र यावं असं माझं आव्हान आहे. एक सूचीबद्ध कार्यक्रम सामूहिकरित्या सुरू करण्याची गरज आहे. सर्व मुद्द्यांवर एकत्र तोडगा काढण्याशिवाय आपल्याला कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं हे ठरवलं पाहिजे. आपल्या देशाला एक चांगला वर्तमान आणि भविष्य देण्यासाठी काम केल पाहिजे," असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, या बैठकीत समाजवादी पक्षाकडून कोणताही नेता सहभागी झाला नव्हता.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसIndiaभारत