शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

सैनिकांना कामगार केले; अग्निवीर कचऱ्यात फेकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:04 IST

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

महेंद्रगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेली अग्निवीर योजना लोकसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यानंतर कचऱ्यात फेकून दिली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मुळात लष्कराला अग्निवीर योजनाच पसंत नव्हती. त्या योजनेने भारतातील जवानांना कामगार केले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. 

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, अग्निवीर ही लष्कराची नव्हे तर मोदींची योजना आहे. ती योजना पंतप्रधान कार्यालयाने तयार केली होती. नियमित सेवेत असलेले लष्करी जवान व अधिकारी यांना पेन्शन, हुतात्मा झाल्यास तसा दर्जा, नियमित सेवेचे सर्व फायदे मिळतात; पण अग्निवीर म्हणून लष्करात भरती झालेल्यांना हुतात्मा म्हणून दर्जाही मिळत नाही तसेच पेन्शन किंवा कॅन्टीनच्या सुविधांपासूनही ते वंचित राहतात. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, इंडिया सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. मोदी यांच्या सरकारने राज्यघटना व आरक्षण रद्द करण्याचा कट आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी