शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना कामगार केले; अग्निवीर कचऱ्यात फेकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:04 IST

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

महेंद्रगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेली अग्निवीर योजना लोकसभा निवडणुकांनंतर इंडिया आघाडी केंद्रात सत्तेत आल्यानंतर कचऱ्यात फेकून दिली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मुळात लष्कराला अग्निवीर योजनाच पसंत नव्हती. त्या योजनेने भारतातील जवानांना कामगार केले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. 

लोकसभा निवडणुकांत राहुल गांधी यांची हरयाणा येथे पार पडलेली ही पहिली प्रचारसभा होती. ते म्हणाले की, देशातील २२ अब्जाधीशांचे सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास पंतप्रधानांनी नकार दिला होता. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, अग्निवीर ही लष्कराची नव्हे तर मोदींची योजना आहे. ती योजना पंतप्रधान कार्यालयाने तयार केली होती. नियमित सेवेत असलेले लष्करी जवान व अधिकारी यांना पेन्शन, हुतात्मा झाल्यास तसा दर्जा, नियमित सेवेचे सर्व फायदे मिळतात; पण अग्निवीर म्हणून लष्करात भरती झालेल्यांना हुतात्मा म्हणून दर्जाही मिळत नाही तसेच पेन्शन किंवा कॅन्टीनच्या सुविधांपासूनही ते वंचित राहतात. 

राहुल गांधी यांनी सांगितले की, इंडिया सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जातील. मोदी यांच्या सरकारने राज्यघटना व आरक्षण रद्द करण्याचा कट आखला आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी