शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:21 IST

“मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.” 

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या, 'संपत्तीच्या पुनर्वितरणा' संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. याशिवाय त्यांनी, जात निहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आल्यास, सर्वांची संपत्ती तपासली जाईल, तिचे पुनर्वितरण केले जाईल आणि ती मुस्लीम तसेच घुसखोरांना दिली जाईल. हा मुद्दा कुठून आला? असा प्रश्न अमित शाह यांना विचारला असता, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तत्कालीन वक्तव्याची आठवण करून दिली...

अमित शाह म्हणाले, “हे देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वक्तव्य आहे. मोठे प्रसिद्ध वक्तव्य होते, की या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आणि अल्पसंख्यकांमध्येही मुस्लिमांचा आहे. आता जेव्हा संपत्तीच्या वितरणाचा मुद्दा येतो, तेव्हा ती संसाधनांच्या माध्यमातूनच होईल. सरकार लोकांची संपत्ती घेऊन वितरित करेल आणि मी म्हणतो, जर हे सत्त नसेल, तर काँग्रेस पक्षाने सांगावे की याचा अर्थ काय?” शाह नेटवर्क18 सोबत एका मुलाखतीत बोलत होते.  

यानंतर, जर काँग्रेसचे सरकार आल्यास, एक देशव्यापी एक्स-रे केला जाईल, यात जनतेच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन कोणत्या वर्गाकडे, कोणत्या जातीकडे किती संपत्ती आहे? इंस्टीट्यूशन्समध्ये किती वाटा आहे? त्या हिशेबाने संपत्तीचे पुनर्वितरण केले जाईल? अशा आशयाच्या राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात विचारले असता, "तर यानुसार मालमत्तेच्या पुनर्वितरणात त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे," असे उत्तर अमित शाह यांनी दिले.

यावर, शाह यांना विचारण्यात आले की, ते (राहुल गांधी) म्हणतात, असमानता संपवण्याच हाच मार्ग आहे? याला उत्तर देताना शाह म्हणाले, “ती त्यांची समज आहे. मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.”  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह