शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 19:21 IST

“मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.” 

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या, 'संपत्तीच्या पुनर्वितरणा' संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. याशिवाय त्यांनी, जात निहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करताना म्हणाले की, काँग्रेस सत्तेवर आल्यास, सर्वांची संपत्ती तपासली जाईल, तिचे पुनर्वितरण केले जाईल आणि ती मुस्लीम तसेच घुसखोरांना दिली जाईल. हा मुद्दा कुठून आला? असा प्रश्न अमित शाह यांना विचारला असता, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तत्कालीन वक्तव्याची आठवण करून दिली...

अमित शाह म्हणाले, “हे देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वक्तव्य आहे. मोठे प्रसिद्ध वक्तव्य होते, की या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यकांचा आणि अल्पसंख्यकांमध्येही मुस्लिमांचा आहे. आता जेव्हा संपत्तीच्या वितरणाचा मुद्दा येतो, तेव्हा ती संसाधनांच्या माध्यमातूनच होईल. सरकार लोकांची संपत्ती घेऊन वितरित करेल आणि मी म्हणतो, जर हे सत्त नसेल, तर काँग्रेस पक्षाने सांगावे की याचा अर्थ काय?” शाह नेटवर्क18 सोबत एका मुलाखतीत बोलत होते.  

यानंतर, जर काँग्रेसचे सरकार आल्यास, एक देशव्यापी एक्स-रे केला जाईल, यात जनतेच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन कोणत्या वर्गाकडे, कोणत्या जातीकडे किती संपत्ती आहे? इंस्टीट्यूशन्समध्ये किती वाटा आहे? त्या हिशेबाने संपत्तीचे पुनर्वितरण केले जाईल? अशा आशयाच्या राहुल गांधी यांच्या विधानासंदर्भात विचारले असता, "तर यानुसार मालमत्तेच्या पुनर्वितरणात त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे," असे उत्तर अमित शाह यांनी दिले.

यावर, शाह यांना विचारण्यात आले की, ते (राहुल गांधी) म्हणतात, असमानता संपवण्याच हाच मार्ग आहे? याला उत्तर देताना शाह म्हणाले, “ती त्यांची समज आहे. मला वाटते की, एवढ्या जुन्या पक्षाने, आपला जाहीरनामा अल्पसंख्याक आणि कट्टर डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून आउटसोर्स केला आहे.”  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह