शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

'मोदी... मोदी... Yes पापा, एनी डेव्हलपमेंट NO पापा', देशाची सत्य परिस्थिती हीच',

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 11:09 AM

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

मुंबई -  केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विधेयकांना संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. अशाच एका आंदोलनातील चिमुकल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच, अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसीमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. पंजाबमधील काँग्रेससह अकाली दलानेही मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत, शेतकऱ्यांच्या बाजुने आंदोलन उभारले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाचा विरोध होत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. मध्य प्रदेशमध्येही काही प्रमाणात मोदींच्या या कृषीविषयक धोरणाला शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच्या हातात मोदींचे चित्र असलेला कागद असून त्यावर एक कविता लिहिलेली आहे. जॉनी.. जॉनी.. एस पापा या कवितेचं हे विडंबन असून मोदींवर गोड शब्दात टीका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत, सध्या देशातील मूळ परिस्थिती हीच, नर्सरी स्कुलच्या या कवितेतील ओवींप्रमाणेच असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.     

कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरीDigvijaya Singhदिग्विजय सिंह