शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अरविंद व नेमाडे यांच्यात साम्य : पंतप्रधान

By admin | Updated: April 26, 2015 01:45 IST

योगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला.

कोसलाकारांना ज्ञानपीठ प्रदान : जे सत्य तेच लिहीन, गावाने मला घडविले : नेमाडेरघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्लीयोगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला. देशीवादाचे प्रवर्तक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यिक योगदानासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसद ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात हा सोहळा झाला. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा प्रसिध्द लेखक नामवर सिंह, ज्ञानपीठ संस्थेचे संचालक लीलाधर मंडलोई , संस्थेच्या आजीव सदस्य तथा लेखिका त्रिशला जैन, संस्थेचे आजीव सदस्य साहू अखिलेश जैन मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पुस्तकाला हवी तेवढी प्रतिष्ठा का मिळत नाही. घर बांधताना किंवा घरातील इंटेरिअर करताना विविध शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा केली जाते. पण बूकशेल्फचा विचारही होत नाही. तरूणांनी हा विचार करायला हवा. दुनिया संगणकाची होत असली तरी ग्रंथाचे महत्त्व असलेच पाहिजे. त्यासाठी मन सतत तयार असले पाहिजे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विविध उदाहरणे देऊन देशाच्या विकासात साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान व विज्ञानाच्या युगात डॉ. नेमाडेंनी वैविध्यपूर्ण लिखाण करून येणाऱ्या पिढींना अक्षरदेण दिली आहे असे म्हटले. योगी अरविंद आणि नेमाडे यांच्यात आपल्याला साम्य वाटते असे सांगून ते म्हणाले, अरविंद गावातून आले होते, त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते व त्यांनी त्यांची साहित्यनिर्मिती त्यांच्या मातृभाषेतूनच केली. डॉ. नेमाडे यांचेही असेच आहे.’ डॉ. नामवर सिंह यांनी डॉ. नेमाडे यांच्या भारतीय साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात इंदू जैन यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली.भाषण इंग्रजीतून केले; विचार देशी असूनही इंग्रजीत बोलत असल्याचा खुलासाडॉ. नेमाडे म्हणाले,भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसाच तो जबाबदारीची आठवणही करून देतो, ही जाणीव ठेवत मी मानवतेसाठी लिखाण करीन व सत्य तेच लिहीन. मला माझ्या गावाने मोठे केले. घडविले. तेथील संस्कार मला प्रेरणा देतात. माझा गावात सात बोलीभाषा, पाच भाषा व सहा धर्मांचे लोक राहतात. भारतीय संगीत व नृत्य तिथे बहरले. जरी मी नास्तिक असलो तरीही भारतीय संस्कृतीतील प्रतीकांचा मी आदर करतो. संशोधनासाठी जगात फिरलो; पण भारतीय संस्कृती व सभ्यता महान आहे. जग एका वळणावर उभे आहे, तेव्हा ही संस्कृती आपण टिकवण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत. ज्ञानपीठ पुरस्कार्त्यांची यादी पाहिली की हा पुरस्कार घेण्याची आपली योग्यता नाही असे वाटते. त्यामुळÞे या क्षणापासून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.नेमाडे यांनी आपले भाषण इंग्रजीतून केले. साहित्य व विचार देशी असूनही आपण इंग्रजीतून बोलत असल्याचा खुलासा करताना ते म्हणाले, आपल्या देशाला गुलामगिरीचे गालबोट लागले आहे. त्यामुळे मी इंग्रजीतून बोलू शकतो. जे चांगले आहे, ते स्वीकारले पाहिजे.