शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद व नेमाडे यांच्यात साम्य : पंतप्रधान

By admin | Updated: April 26, 2015 01:45 IST

योगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला.

कोसलाकारांना ज्ञानपीठ प्रदान : जे सत्य तेच लिहीन, गावाने मला घडविले : नेमाडेरघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्लीयोगी अरविंद व भालचंद्र नेमाडे यांच्यात मला साम्य वाटते, अशी तुलना करून ‘या दोघांची साहित्यिक जडणघडण एकसारखी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालचंद्र नेमाडे यांचा गौरव केला. देशीवादाचे प्रवर्तक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यिक योगदानासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसद ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात हा सोहळा झाला. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा प्रसिध्द लेखक नामवर सिंह, ज्ञानपीठ संस्थेचे संचालक लीलाधर मंडलोई , संस्थेच्या आजीव सदस्य तथा लेखिका त्रिशला जैन, संस्थेचे आजीव सदस्य साहू अखिलेश जैन मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पुस्तकाला हवी तेवढी प्रतिष्ठा का मिळत नाही. घर बांधताना किंवा घरातील इंटेरिअर करताना विविध शोभेच्या वस्तू ठेवण्यासाठी जागा केली जाते. पण बूकशेल्फचा विचारही होत नाही. तरूणांनी हा विचार करायला हवा. दुनिया संगणकाची होत असली तरी ग्रंथाचे महत्त्व असलेच पाहिजे. त्यासाठी मन सतत तयार असले पाहिजे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विविध उदाहरणे देऊन देशाच्या विकासात साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान व विज्ञानाच्या युगात डॉ. नेमाडेंनी वैविध्यपूर्ण लिखाण करून येणाऱ्या पिढींना अक्षरदेण दिली आहे असे म्हटले. योगी अरविंद आणि नेमाडे यांच्यात आपल्याला साम्य वाटते असे सांगून ते म्हणाले, अरविंद गावातून आले होते, त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले होते व त्यांनी त्यांची साहित्यनिर्मिती त्यांच्या मातृभाषेतूनच केली. डॉ. नेमाडे यांचेही असेच आहे.’ डॉ. नामवर सिंह यांनी डॉ. नेमाडे यांच्या भारतीय साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात इंदू जैन यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली.भाषण इंग्रजीतून केले; विचार देशी असूनही इंग्रजीत बोलत असल्याचा खुलासाडॉ. नेमाडे म्हणाले,भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसाच तो जबाबदारीची आठवणही करून देतो, ही जाणीव ठेवत मी मानवतेसाठी लिखाण करीन व सत्य तेच लिहीन. मला माझ्या गावाने मोठे केले. घडविले. तेथील संस्कार मला प्रेरणा देतात. माझा गावात सात बोलीभाषा, पाच भाषा व सहा धर्मांचे लोक राहतात. भारतीय संगीत व नृत्य तिथे बहरले. जरी मी नास्तिक असलो तरीही भारतीय संस्कृतीतील प्रतीकांचा मी आदर करतो. संशोधनासाठी जगात फिरलो; पण भारतीय संस्कृती व सभ्यता महान आहे. जग एका वळणावर उभे आहे, तेव्हा ही संस्कृती आपण टिकवण्यासाठी परिश्रम घ्यायला हवेत. ज्ञानपीठ पुरस्कार्त्यांची यादी पाहिली की हा पुरस्कार घेण्याची आपली योग्यता नाही असे वाटते. त्यामुळÞे या क्षणापासून आपली जबाबदारी आणखी वाढली आहे.नेमाडे यांनी आपले भाषण इंग्रजीतून केले. साहित्य व विचार देशी असूनही आपण इंग्रजीतून बोलत असल्याचा खुलासा करताना ते म्हणाले, आपल्या देशाला गुलामगिरीचे गालबोट लागले आहे. त्यामुळे मी इंग्रजीतून बोलू शकतो. जे चांगले आहे, ते स्वीकारले पाहिजे.