शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

शिक्षण सुटले, हाती आले काम! राज्यात बालकामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘क्राय’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:50 IST

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे.

मुंबई :

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. बाल हक्क स्वयंसेवी संस्था, बाल हक्क आणि क्राय या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या काळात शेती तसेच इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात आढळून आले. हे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय असून, मुंबईसारख्या शहरी भागातही बालमजूर ८ ते १२ तास काम करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

क्राय या सेवाभावी संस्थेने राज्याच्या जालना, अहमदनगर, लातूर, वर्धा, नंदुरबार, परभणी या सहा जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील बालकामगारांचा एकूण आकडा २०२० मध्ये दोन हजार ५५६ वरून २०२१ मध्ये तीन हजार ३५६वर गेला आहे. सध्या २०२२ मध्ये हीच आकडेवारी तीन हजार ३०९ आहे. शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाइल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण तसेच सरकारी बससेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे निरीक्षण या संस्थेचे संचालक क्रियान रबाडी यांनी नोंदविले.

शिक्षण सुटल्याने घरकामाचा भारग्रामीण भागातील परिस्थितीप्रमाणे शहरी भागातील परिस्थितीही फार वेगळी नाही. सर्वेक्षणादरम्यान वांद्रेच्या राहुल नगर, सायन कोळीवाडा आणि मानखुर्दच्या चित्ता कॅम्पमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील ५८९ मुलांपैकी १४५ मुले सध्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेली असून, त्यापैकी ८४ मुली स्वयंपाक, झाडू मारणे, कपडे आणि भांडी धुणे आणि वृद्ध किंवा लहानग्यांची काळजी घेणे अशा घरकामात गुंतलेले असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणात प्रतिसाद दिलेल्या ८४ टक्के लोकांमधील ६४ टक्के लोकांना आर्थिक परिस्थिती व पैशाअभावी मुलांना कामे करण्यासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे ३५ टक्के लोकांनी वाढते बालकामगार हा चिंतेचा विषय असल्याचे मत संस्थेकडे नोंदविले आहे.

काम करणाऱ्या मुलांबाबतची काही निरीक्षणे पुढीलप्रमाणे>> अनेकदा पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, शुल्क भरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या मिळकतींचा उपयोग होत असला तरीही चिंताजनक बाब म्हणजे, काही मुले त्यांची कमाई तंबाखूजन्य उत्पादनांवर खर्च करतात, असे दिसून आले आहे.

>> कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा भार जाणवून, १०० ते ५०० रुपयांसाठी मुलांनी शाळेत जाण्याऐवजी काम करणे पसंत केले आहे.

>>  शेतीतील रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे काही मुलांना त्रास झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.>>   मुले कामानिमित्त शेजारच्या शहरात स्थलांतरित होतात. मुंबई, पुणे, दौंड, बीड, मनमाड, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये घरकामगार, भिकारी, मजूर म्हणून ही मुले अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टी मजुरीचे काम करतात. ऊसतोडणी, सिंचन, शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लागवड, आंतरपीक, मळणी, फवारणी आदी कामांमुळे अनेकजण स्थलांतर करतात. 

आर्थिक परिस्थिती व वाईट सवयीच्या विळख्यात अडकून या काळात एक पिढी बालमजुरीच्या चक्रात अडकत चालली आहे. ती शिक्षणापासून दूर होत आहे. याचसाठी बालमजुरी आणि त्याचे मुलांवर होणारे हानिकारक परिणाम या विषयांवर मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.- क्रियान रबाडी, संचालक, क्राय (पश्चिम विभाग)

टॅग्स :LabourकामगारIndiaभारत