शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सुटले, हाती आले काम! राज्यात बालकामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ; ‘क्राय’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 06:50 IST

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे.

मुंबई :

गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या महामारी आणि त्यानंतरच्या संचारबंदीचा महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खोलवर परिणाम झाला आहे. बाल हक्क स्वयंसेवी संस्था, बाल हक्क आणि क्राय या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार या काळात शेती तसेच इतर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मुलांचे प्रमाण लक्षणीय स्वरूपात आढळून आले. हे प्रमाण ग्रामीण भागात लक्षणीय असून, मुंबईसारख्या शहरी भागातही बालमजूर ८ ते १२ तास काम करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

क्राय या सेवाभावी संस्थेने राज्याच्या जालना, अहमदनगर, लातूर, वर्धा, नंदुरबार, परभणी या सहा जिल्ह्यांत केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील बालकामगारांचा एकूण आकडा २०२० मध्ये दोन हजार ५५६ वरून २०२१ मध्ये तीन हजार ३५६वर गेला आहे. सध्या २०२२ मध्ये हीच आकडेवारी तीन हजार ३०९ आहे. शाळा बंद होणे, ऑनलाइन वर्गांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाइल फोनचा अभाव, नोकरी गमावल्यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण तसेच सरकारी बससेवेच्या प्रदीर्घ संपामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम झाल्याचे दिसून आल्याचे निरीक्षण या संस्थेचे संचालक क्रियान रबाडी यांनी नोंदविले.

शिक्षण सुटल्याने घरकामाचा भारग्रामीण भागातील परिस्थितीप्रमाणे शहरी भागातील परिस्थितीही फार वेगळी नाही. सर्वेक्षणादरम्यान वांद्रेच्या राहुल नगर, सायन कोळीवाडा आणि मानखुर्दच्या चित्ता कॅम्पमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातील ५८९ मुलांपैकी १४५ मुले सध्या वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये गुंतलेली असून, त्यापैकी ८४ मुली स्वयंपाक, झाडू मारणे, कपडे आणि भांडी धुणे आणि वृद्ध किंवा लहानग्यांची काळजी घेणे अशा घरकामात गुंतलेले असल्याचे निरीक्षण सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. सर्वेक्षणात प्रतिसाद दिलेल्या ८४ टक्के लोकांमधील ६४ टक्के लोकांना आर्थिक परिस्थिती व पैशाअभावी मुलांना कामे करण्यासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे ३५ टक्के लोकांनी वाढते बालकामगार हा चिंतेचा विषय असल्याचे मत संस्थेकडे नोंदविले आहे.

काम करणाऱ्या मुलांबाबतची काही निरीक्षणे पुढीलप्रमाणे>> अनेकदा पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, शुल्क भरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या मिळकतींचा उपयोग होत असला तरीही चिंताजनक बाब म्हणजे, काही मुले त्यांची कमाई तंबाखूजन्य उत्पादनांवर खर्च करतात, असे दिसून आले आहे.

>> कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा भार जाणवून, १०० ते ५०० रुपयांसाठी मुलांनी शाळेत जाण्याऐवजी काम करणे पसंत केले आहे.

>>  शेतीतील रासायनिक खतांमुळे व औषधांमुळे काही मुलांना त्रास झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.>>   मुले कामानिमित्त शेजारच्या शहरात स्थलांतरित होतात. मुंबई, पुणे, दौंड, बीड, मनमाड, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये घरकामगार, भिकारी, मजूर म्हणून ही मुले अनेकदा वाढपी किंवा वीटभट्टी मजुरीचे काम करतात. ऊसतोडणी, सिंचन, शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लागवड, आंतरपीक, मळणी, फवारणी आदी कामांमुळे अनेकजण स्थलांतर करतात. 

आर्थिक परिस्थिती व वाईट सवयीच्या विळख्यात अडकून या काळात एक पिढी बालमजुरीच्या चक्रात अडकत चालली आहे. ती शिक्षणापासून दूर होत आहे. याचसाठी बालमजुरी आणि त्याचे मुलांवर होणारे हानिकारक परिणाम या विषयांवर मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.- क्रियान रबाडी, संचालक, क्राय (पश्चिम विभाग)

टॅग्स :LabourकामगारIndiaभारत