कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 03:40 PM2021-02-26T15:40:48+5:302021-02-26T15:48:43+5:30

Indian Children in Covid-19 : देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत.

side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in the India | कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

Next
ठळक मुद्देदेशातील ३७.५ कोटी मुले दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतीलकोरोनामुळे जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत

नवी दिल्ली - देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहे. (corona virus) विशेष करून लहान मुलांच्या शारीरिक विकासावर कोरोनाचा मोठा परिणाम होणार आहे. (Indian Children in Covid-19 ) कोरोनामुळे मुलांच्या मृत्युदरात वाढ होणार असून, त्यांचे शिक्षणही विस्कळीत होण्याची शक्यता आहे, ही भीती सेंटर फॉर सायन्स अँड  एन्व्हायरमेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालामध्ये स्टेट ऑफ इंडियाज एन्व्हायर्मेंट (सीएसई) च्या वार्षिक अहवालात स्टेट ऑफ इंडियाज एन्वायर्मेंट २०२१ मधून व्यक्त करण्यात आली आहे. सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांच्यासह देशभरातील ६० हून अधिक पर्यावरणवाद्यांनी एकत्रितपणे हा अहवाल गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.  (side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in India)

या अहवालानुसार, भारत आता महामारी जनरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील ३७.५ कोटी मुले (नवजात अर्भकांपासून ते १४ वर्षांच्या मुलांपर्यंत) दीर्घकाळापर्यंत कायम राहणाऱ्या कोरोनाच्या दुष्परिणामांच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यांची रोगप्रतिकार क्षमता प्रभावित झाल्यामुळे हे दुष्परिणाम कमी वजन, कमी उंची आणि मृत्यूदरात वाढ या रूपात दिसतील. तसेच शैक्षणिक नुकसानापर्यंत दुष्परिणाम दिसून येणार आहेत. जगभरात ५० कोटींहून अधिक मुलांची शाळा सुटली आहे. त्यातील अर्ध्याहून अधिक मुले ही भारतात आहेत. 

सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी सांगितले की, आता कोरोना विषाणू आमच्यासाठी दीर्घकाळासाठी काय सोडून जाणार आहे याचा तपास करण्याची वेळ आली आहे. एक पिढी अस्वस्थता, कुपोष, गरिबी आणि शैक्षणिक लाभांबाबत दुर्बलतेने घेरली गेली आहे. त्याबरोबरच पर्यावरणाचा निरंतर विकासासाठी उपयोग कऱण्याचेही आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणीय आव्हानांच्या काळात आम्ही उदरनिर्वाह आणि पोषण सुरक्षेबाबत सुधारणा करू शकू.  

सीएसईच्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्यानंतरही भारतात कोरोनाचा संसर्ग थांबू शकला नाही. देशातील लोकसंख्येचा मोठा भाग हा झोपडपट्ट्या तसेच दाट लोकवस्तीमध्ये राहतो. तिथे ना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आहे. ना तिथे योग्य स्वच्छता होते. अशा परिस्थितीत संसर्गाची शक्यता सातत्याने कायम असते.   

Web Title: side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in the India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.