शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

धक्कादायक प्रकार : वकील नसूनही ते होते २५ वर्षे न्यायाधीश! कायद्याची अमान्यताप्राप्त पदवी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:51 IST

न्यायाधीश हा प्रथम वकील असावा लागतो, हा साधा सरळ नियम आहे. परंतु तमिळनाडूतील एक व्यक्ती कायद्याची मान्यताप्राप्त पदवी नसूनही तब्बल २५ वर्षे न्यायाधीश म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

चेन्नई: न्यायाधीश हा प्रथम वकील असावा लागतो, हा साधा सरळ नियम आहे. परंतु तमिळनाडूतील एक व्यक्ती कायद्याची मान्यताप्राप्त पदवी नसूनही तब्बल २५ वर्षे न्यायाधीश म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मदुराई जिल्ह्यातील उलगनेरी येथील पी. नटराजन या महाभागाने ही अजब ‘कर्तबगारी’ केली आहे. तमिळनाडूच्या न्यायिक सेवेत २५ वर्षे न्याय दंडाधिकारी या पदावर नोकरी करून नटराजन ३० जून २००३ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी तमिळनाड व पुद्दुचेरी बार कौन्सिलकडे नोंदणी करून वकिलीची सनद घेतली.मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने ‘बनावट’ वकिलांचा पायबंद करण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व वकिलांची पात्रता तपासून पाहण्याचा आदेश सर्व राज्यांच्या बार कौन्सिलना दिला. त्यानुसार शहानिशा करत असताना नटराजन यांचे हे धक्कादायक प्रकरण उघड झाले.नटराजन यांच्याकडे कर्नाटकमधील म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न शारदा विधी महाविद्यालयातून सन १९७८ मध्ये दोन वर्षांच्या पत्राचार अभ्यासक्रमाने घेतलेली ‘बीजीएल’ ही कायद्याची पदवी आहे. अशा पत्राचाराने मिळविलेली पदवी फक्त अभ्यासापुरती मान्यताप्राप्त मानली जाते, नोकरीसाठी नाही. तरी अशा अमान्यताप्राप्त पदवीच्या जोरावर नटराजन यांची १९८३ मध्ये मुळात दंडाधिकारी म्हणून निवड कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्थात नटराजन यांच्या या बनावटपणामध्ये बार कौन्सिलचाही सहभाग आहे. कारण दंडाधिकारी म्हणून नेमणूक होण्यासाठी ‘वकील’ म्हणून नोंदणी असणे गरजेचे असते. नटराजन यांच्याकडे तशी नोंदणी होती. त्यामुळे अमान्यताप्राप्त पदवीवर त्यांची मुळात बार कौन्सिलने ‘वकील’ म्हणून नोंदणी कशी केली व नंतर सरकारने त्यांची दंडाधिकारी म्हणून निवड करून तब्बल २५ वर्षे त्या पदावर नोकरी कशी करू दिली, असे प्रश्न या प्रकरणात उभे राहिले आहेत.बार कौन्सिलने आता नटराजन यांची ‘वकील’ म्हणून केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी त्यांना नोटीस काढली आहे. जी व्यक्ती २५ वर्षे न्याय दंडाधिकारी पदावर नोकरी करून निवृत्त झाला त्याच्यावर अशी कारवाई करणे अन्यायाचे आहे, असे नटराजन यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हाeducationशैक्षणिक