शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

धक्कादायक प्रकार : वकील नसूनही ते होते २५ वर्षे न्यायाधीश! कायद्याची अमान्यताप्राप्त पदवी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:51 IST

न्यायाधीश हा प्रथम वकील असावा लागतो, हा साधा सरळ नियम आहे. परंतु तमिळनाडूतील एक व्यक्ती कायद्याची मान्यताप्राप्त पदवी नसूनही तब्बल २५ वर्षे न्यायाधीश म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

चेन्नई: न्यायाधीश हा प्रथम वकील असावा लागतो, हा साधा सरळ नियम आहे. परंतु तमिळनाडूतील एक व्यक्ती कायद्याची मान्यताप्राप्त पदवी नसूनही तब्बल २५ वर्षे न्यायाधीश म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मदुराई जिल्ह्यातील उलगनेरी येथील पी. नटराजन या महाभागाने ही अजब ‘कर्तबगारी’ केली आहे. तमिळनाडूच्या न्यायिक सेवेत २५ वर्षे न्याय दंडाधिकारी या पदावर नोकरी करून नटराजन ३० जून २००३ रोजी निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी तमिळनाड व पुद्दुचेरी बार कौन्सिलकडे नोंदणी करून वकिलीची सनद घेतली.मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने ‘बनावट’ वकिलांचा पायबंद करण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व वकिलांची पात्रता तपासून पाहण्याचा आदेश सर्व राज्यांच्या बार कौन्सिलना दिला. त्यानुसार शहानिशा करत असताना नटराजन यांचे हे धक्कादायक प्रकरण उघड झाले.नटराजन यांच्याकडे कर्नाटकमधील म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न शारदा विधी महाविद्यालयातून सन १९७८ मध्ये दोन वर्षांच्या पत्राचार अभ्यासक्रमाने घेतलेली ‘बीजीएल’ ही कायद्याची पदवी आहे. अशा पत्राचाराने मिळविलेली पदवी फक्त अभ्यासापुरती मान्यताप्राप्त मानली जाते, नोकरीसाठी नाही. तरी अशा अमान्यताप्राप्त पदवीच्या जोरावर नटराजन यांची १९८३ मध्ये मुळात दंडाधिकारी म्हणून निवड कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्थात नटराजन यांच्या या बनावटपणामध्ये बार कौन्सिलचाही सहभाग आहे. कारण दंडाधिकारी म्हणून नेमणूक होण्यासाठी ‘वकील’ म्हणून नोंदणी असणे गरजेचे असते. नटराजन यांच्याकडे तशी नोंदणी होती. त्यामुळे अमान्यताप्राप्त पदवीवर त्यांची मुळात बार कौन्सिलने ‘वकील’ म्हणून नोंदणी कशी केली व नंतर सरकारने त्यांची दंडाधिकारी म्हणून निवड करून तब्बल २५ वर्षे त्या पदावर नोकरी कशी करू दिली, असे प्रश्न या प्रकरणात उभे राहिले आहेत.बार कौन्सिलने आता नटराजन यांची ‘वकील’ म्हणून केलेली नोंदणी रद्द करण्यासाठी त्यांना नोटीस काढली आहे. जी व्यक्ती २५ वर्षे न्याय दंडाधिकारी पदावर नोकरी करून निवृत्त झाला त्याच्यावर अशी कारवाई करणे अन्यायाचे आहे, असे नटराजन यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हाeducationशैक्षणिक